शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

कांदा, टोमॅटो, घेवडा आणि काकडीच्या दरात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे़. दरम्यान, तुलनेने मागणी कमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे़. दरम्यान, तुलनेने मागणी कमी असल्याने बटाटा, कांदा, टोमॅटो, काकडी आणि घेवड्याच्या दरात घसरण झाली. तर, लसूण आणि हिरवी मिरचीच्या दरात १०-२० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. ३) रोजी सुमारे ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यांतून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १० ट्रक गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेशातून मटार ३० ते ३५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून ८ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ट्रक इतकी आवक झाली आहे. तर, स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १३०० ते १४०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ९ ते १०

हजार पेटी, भुईमूग शेंगा ५० ते ६० पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, कांद्यामध्ये जुना कांदा २५ ते ३० ट्रक, तर नवीन कांदा १०० ट्रक इतकी आवक झाली.

--

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा २०-२५ ३०-५०

बटाटा १५-२५ २०-३५

टोमॅटो ०५-७ १०-१५

भेंडी २०-३० २५-४०

गवार ३९-४० ४०-५०

मिरची ३५-५० ४५-५५

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०७-०८ १०-१५

मटार १८-२० २५-३०

--

पालेभाज्या पुन्हा महागल्या

पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने व मागणीत वाढ झाल्याने मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई आणि चवळईच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या दरात ६ रुपये, शेपू २ रुपये, कांदापात एक रुपया, चाकवत २ रुपये, करडई एक रुपया आणि चवळईच्या भावात ४ रुपयांनी वाढ झाली. तर, आवकेच्या तुलनेत मागणी घटल्याने कोथिंबीर, राजगिरा आणि हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी १ रुपया आणि पालकच्या दरात २ रुपयांनी घट झाली आहे. तर पुदीना, अंबाडी आणि चुकाचे भाव मात्र स्थिर आहेत.

- विलास भुजबळ, व्यापारी

---

कांदा, बटाटा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला

कोरोना आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचे कारण देत गेले आठ-दहा महिने कांदा, बटाट्याचे दर सतत वाढतच होते. कांदा, बटाटा किचनमध्ये सतत लागत असल्याने कितीही महाग झाला, तरी घ्यावाच लागतो. परंतु आता कांदा ३० रुपयांपर्यंत, तर बटाटा २०-२५ रुपये किलो मिळत आहे. हेच दर ६० ते शंभरी गाठली होती.

- छाया चिंचली, गृहिणी