शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कांदा, टोमॅटो, घेवडा आणि काकडीच्या दरात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे़. दरम्यान, तुलनेने मागणी कमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे़. दरम्यान, तुलनेने मागणी कमी असल्याने बटाटा, कांदा, टोमॅटो, काकडी आणि घेवड्याच्या दरात घसरण झाली. तर, लसूण आणि हिरवी मिरचीच्या दरात १०-२० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. ३) रोजी सुमारे ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यांतून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १० ट्रक गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेशातून मटार ३० ते ३५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून ८ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ट्रक इतकी आवक झाली आहे. तर, स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १३०० ते १४०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ९ ते १०

हजार पेटी, भुईमूग शेंगा ५० ते ६० पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, कांद्यामध्ये जुना कांदा २५ ते ३० ट्रक, तर नवीन कांदा १०० ट्रक इतकी आवक झाली.

--

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा २०-२५ ३०-५०

बटाटा १५-२५ २०-३५

टोमॅटो ०५-७ १०-१५

भेंडी २०-३० २५-४०

गवार ३९-४० ४०-५०

मिरची ३५-५० ४५-५५

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०७-०८ १०-१५

मटार १८-२० २५-३०

--

पालेभाज्या पुन्हा महागल्या

पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने व मागणीत वाढ झाल्याने मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई आणि चवळईच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या दरात ६ रुपये, शेपू २ रुपये, कांदापात एक रुपया, चाकवत २ रुपये, करडई एक रुपया आणि चवळईच्या भावात ४ रुपयांनी वाढ झाली. तर, आवकेच्या तुलनेत मागणी घटल्याने कोथिंबीर, राजगिरा आणि हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी १ रुपया आणि पालकच्या दरात २ रुपयांनी घट झाली आहे. तर पुदीना, अंबाडी आणि चुकाचे भाव मात्र स्थिर आहेत.

- विलास भुजबळ, व्यापारी

---

कांदा, बटाटा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला

कोरोना आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचे कारण देत गेले आठ-दहा महिने कांदा, बटाट्याचे दर सतत वाढतच होते. कांदा, बटाटा किचनमध्ये सतत लागत असल्याने कितीही महाग झाला, तरी घ्यावाच लागतो. परंतु आता कांदा ३० रुपयांपर्यंत, तर बटाटा २०-२५ रुपये किलो मिळत आहे. हेच दर ६० ते शंभरी गाठली होती.

- छाया चिंचली, गृहिणी