शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, टोमॅटो, घेवडा आणि काकडीच्या दरात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे़. दरम्यान, तुलनेने मागणी कमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे़. दरम्यान, तुलनेने मागणी कमी असल्याने बटाटा, कांदा, टोमॅटो, काकडी आणि घेवड्याच्या दरात घसरण झाली. तर, लसूण आणि हिरवी मिरचीच्या दरात १०-२० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. ३) रोजी सुमारे ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यांतून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १० ट्रक गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेशातून मटार ३० ते ३५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून ८ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ट्रक इतकी आवक झाली आहे. तर, स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १३०० ते १४०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ९ ते १०

हजार पेटी, भुईमूग शेंगा ५० ते ६० पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, कांद्यामध्ये जुना कांदा २५ ते ३० ट्रक, तर नवीन कांदा १०० ट्रक इतकी आवक झाली.

--

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा २०-२५ ३०-५०

बटाटा १५-२५ २०-३५

टोमॅटो ०५-७ १०-१५

भेंडी २०-३० २५-४०

गवार ३९-४० ४०-५०

मिरची ३५-५० ४५-५५

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०७-०८ १०-१५

मटार १८-२० २५-३०

--

पालेभाज्या पुन्हा महागल्या

पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने व मागणीत वाढ झाल्याने मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई आणि चवळईच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या दरात ६ रुपये, शेपू २ रुपये, कांदापात एक रुपया, चाकवत २ रुपये, करडई एक रुपया आणि चवळईच्या भावात ४ रुपयांनी वाढ झाली. तर, आवकेच्या तुलनेत मागणी घटल्याने कोथिंबीर, राजगिरा आणि हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी १ रुपया आणि पालकच्या दरात २ रुपयांनी घट झाली आहे. तर पुदीना, अंबाडी आणि चुकाचे भाव मात्र स्थिर आहेत.

- विलास भुजबळ, व्यापारी

---

कांदा, बटाटा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला

कोरोना आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचे कारण देत गेले आठ-दहा महिने कांदा, बटाट्याचे दर सतत वाढतच होते. कांदा, बटाटा किचनमध्ये सतत लागत असल्याने कितीही महाग झाला, तरी घ्यावाच लागतो. परंतु आता कांदा ३० रुपयांपर्यंत, तर बटाटा २०-२५ रुपये किलो मिळत आहे. हेच दर ६० ते शंभरी गाठली होती.

- छाया चिंचली, गृहिणी