शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

भोरला काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: September 13, 2015 01:35 IST

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुणे : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. बिनविरोध झालेल्या ४ जागाही काँग्रेस पक्षाच्या असल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्याने, पुन्हा एकदा बाजार समितीत काँग्रेसने एकहाती सत्ता कायम राखली आहे. विरोधी राष्ट्रवादीच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. विजयी उमेदवारांची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांचा माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०१५ ते २०२०च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध गटांतील १९ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. या सर्व जागा काँग्रेसच्याच होत्या, तर १५ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यांत काँॅग्रेस व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी १५ तर शिवसेनेचे २, भाजपाचा एक आणि दोन जागांवर अपक्ष उभे होते. आज सकाळी ९ वाजल्यापासून खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये निवडणूक अधिकारी प्रवीण परब यांनी ग्रामपंचायत व कृषी पतसंस्था मतदारसंघातील मतमोजणी एकाच वेळी सुरू केली. प्रथम खानापूर, संगमनेर, भोर, आंबेघर या मतदान केंद्रांपैकी भोर वगळता इतर तिन्ही केंद्रांवर सुरवातीपासूनच काँग्रेसने आघाडी घेतली आणि नंतर शिवरे, किकवी, नसरापूर या केंद्रांवरही आघाडी कायम ठेवून सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळविला.कृषी पतसंस्था मतदारसंघात कमीत कमी ७३, तर जास्तीत जास्त १२९ मतांनी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सर्वाधिक ४७२ मते संदीप चक्के यांनी घेतली, तर ग्रामपंचायत मतदारसंघात सोमनाथ निगडे यांना सर्वाधिक ५५१ मते मिळाली आहेत. सर्व ७ मतदान केंद्रांवर एकूण मतांपैकी कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघात १०१, महिला गटात ५५, इतर मागास गटात ४६, भटक्या विमुक्त गटात ४८ मते बाद झाली, तर सर्वसाधारण मतदारसंघात ५७, अनुसूचित जाती गटात ५०, आर्थिक दुर्बल गटात ४९ मते बाद झाली आहेत. एकूण मतांपैकी १० ते १५ टक्के मते बाद झाली, तर तेवढ्याच मतांचे क्रॉस वोटिंग झाले आहे.मागच्या वेळी वाटाघाटी करून, ५ जागा राष्ट्रवादीला दिल्या होत्या. सध्या दुष्काळसदृश परिस्थती असल्याने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच आमची इच्छा होती. तरीही विरोधकांनी निवडणूक लादली. सर्वच जागा जिंकून आम्ही विरोधकांना खऱ्या अर्थाने धोबीपछाड दिला आहे. - संग्राम थोपटे (आमदार, राजगड कृषी विकास पॅनलचे प्रमुख)