शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भोरला काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: September 13, 2015 01:35 IST

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुणे : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. बिनविरोध झालेल्या ४ जागाही काँग्रेस पक्षाच्या असल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्याने, पुन्हा एकदा बाजार समितीत काँग्रेसने एकहाती सत्ता कायम राखली आहे. विरोधी राष्ट्रवादीच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. विजयी उमेदवारांची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांचा माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०१५ ते २०२०च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध गटांतील १९ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. या सर्व जागा काँग्रेसच्याच होत्या, तर १५ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यांत काँॅग्रेस व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी १५ तर शिवसेनेचे २, भाजपाचा एक आणि दोन जागांवर अपक्ष उभे होते. आज सकाळी ९ वाजल्यापासून खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये निवडणूक अधिकारी प्रवीण परब यांनी ग्रामपंचायत व कृषी पतसंस्था मतदारसंघातील मतमोजणी एकाच वेळी सुरू केली. प्रथम खानापूर, संगमनेर, भोर, आंबेघर या मतदान केंद्रांपैकी भोर वगळता इतर तिन्ही केंद्रांवर सुरवातीपासूनच काँग्रेसने आघाडी घेतली आणि नंतर शिवरे, किकवी, नसरापूर या केंद्रांवरही आघाडी कायम ठेवून सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळविला.कृषी पतसंस्था मतदारसंघात कमीत कमी ७३, तर जास्तीत जास्त १२९ मतांनी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सर्वाधिक ४७२ मते संदीप चक्के यांनी घेतली, तर ग्रामपंचायत मतदारसंघात सोमनाथ निगडे यांना सर्वाधिक ५५१ मते मिळाली आहेत. सर्व ७ मतदान केंद्रांवर एकूण मतांपैकी कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघात १०१, महिला गटात ५५, इतर मागास गटात ४६, भटक्या विमुक्त गटात ४८ मते बाद झाली, तर सर्वसाधारण मतदारसंघात ५७, अनुसूचित जाती गटात ५०, आर्थिक दुर्बल गटात ४९ मते बाद झाली आहेत. एकूण मतांपैकी १० ते १५ टक्के मते बाद झाली, तर तेवढ्याच मतांचे क्रॉस वोटिंग झाले आहे.मागच्या वेळी वाटाघाटी करून, ५ जागा राष्ट्रवादीला दिल्या होत्या. सध्या दुष्काळसदृश परिस्थती असल्याने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच आमची इच्छा होती. तरीही विरोधकांनी निवडणूक लादली. सर्वच जागा जिंकून आम्ही विरोधकांना खऱ्या अर्थाने धोबीपछाड दिला आहे. - संग्राम थोपटे (आमदार, राजगड कृषी विकास पॅनलचे प्रमुख)