शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

भोरला काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: September 13, 2015 01:35 IST

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुणे : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. बिनविरोध झालेल्या ४ जागाही काँग्रेस पक्षाच्या असल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्याने, पुन्हा एकदा बाजार समितीत काँग्रेसने एकहाती सत्ता कायम राखली आहे. विरोधी राष्ट्रवादीच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. विजयी उमेदवारांची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांचा माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०१५ ते २०२०च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध गटांतील १९ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. या सर्व जागा काँग्रेसच्याच होत्या, तर १५ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यांत काँॅग्रेस व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी १५ तर शिवसेनेचे २, भाजपाचा एक आणि दोन जागांवर अपक्ष उभे होते. आज सकाळी ९ वाजल्यापासून खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये निवडणूक अधिकारी प्रवीण परब यांनी ग्रामपंचायत व कृषी पतसंस्था मतदारसंघातील मतमोजणी एकाच वेळी सुरू केली. प्रथम खानापूर, संगमनेर, भोर, आंबेघर या मतदान केंद्रांपैकी भोर वगळता इतर तिन्ही केंद्रांवर सुरवातीपासूनच काँग्रेसने आघाडी घेतली आणि नंतर शिवरे, किकवी, नसरापूर या केंद्रांवरही आघाडी कायम ठेवून सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळविला.कृषी पतसंस्था मतदारसंघात कमीत कमी ७३, तर जास्तीत जास्त १२९ मतांनी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सर्वाधिक ४७२ मते संदीप चक्के यांनी घेतली, तर ग्रामपंचायत मतदारसंघात सोमनाथ निगडे यांना सर्वाधिक ५५१ मते मिळाली आहेत. सर्व ७ मतदान केंद्रांवर एकूण मतांपैकी कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघात १०१, महिला गटात ५५, इतर मागास गटात ४६, भटक्या विमुक्त गटात ४८ मते बाद झाली, तर सर्वसाधारण मतदारसंघात ५७, अनुसूचित जाती गटात ५०, आर्थिक दुर्बल गटात ४९ मते बाद झाली आहेत. एकूण मतांपैकी १० ते १५ टक्के मते बाद झाली, तर तेवढ्याच मतांचे क्रॉस वोटिंग झाले आहे.मागच्या वेळी वाटाघाटी करून, ५ जागा राष्ट्रवादीला दिल्या होत्या. सध्या दुष्काळसदृश परिस्थती असल्याने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच आमची इच्छा होती. तरीही विरोधकांनी निवडणूक लादली. सर्वच जागा जिंकून आम्ही विरोधकांना खऱ्या अर्थाने धोबीपछाड दिला आहे. - संग्राम थोपटे (आमदार, राजगड कृषी विकास पॅनलचे प्रमुख)