शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भीमा नदीचे झाले गटार; दूषित पाण्याचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 22:56 IST

नदी प्रदूषणाचे मोठे संकट : जलपर्णीचा विळखा, नदीकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात

राजगुरुनगर : भीमा नदीच्या पात्रात थेट मिसळणारे मैलामिश्रित पाणी, घनकचरा, नदीपात्रात थेट मिसळणारे सांडपाणी, जलपर्णी यांमुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. भीमा नदी याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. भीमा नदीकाठी असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधून पुरवठा होणारे दूषित पाणी पाहता गावांचे आरोग्यही दूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे.

संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता कुकडी, मीना, घोड, भीमा, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा या मोठ्या नद्या आहेत. या नद्यांच्या पात्राकडे लक्ष टाकल्यास विदारक चित्र समोर दिसते. जलपर्णी आणि तत्सम वनस्पतींनी व्यापलेले पात्र, नदीकाठावर उभे राहिल्यास अनुभवावयास येणारी दुर्गंधी आणि वाहणारे काळे पाणी! नद्यांचे हे विदारक रूप सध्याचे वास्तव आहे. या नद्या पाणी नव्हे, तर विष वाहून नेत असल्याचे दिसते. नदीत मिसळणाऱ्या या विषयुक्त पाण्यामुळे नद्यांमधील जलचर प्राण्यांच्या अस्तित्वापुढे धोका निर्माण झाला आहे. नद्यांची पात्रे जलपर्णीच्या मगरमिठीत अडकली आहेत.

वास्तविक नदी प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंशिस्तीची गरज आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे त्यातून सांडपाणी व कचºयावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रसंगी प्रदूषणास कारणीभूत ठरणाºया घटकांवर कडक कायदेशीर कारवाईची आवश्यकता आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात चालणारी नदी बचाव मोहीम, नदी महोत्सव हाती घेऊन नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढवणे गरजेचे बनले आहे. अन्यथा विष वाहून नेणाºया नद्या नागरिकांच्या आरोग्यापुढे जटिल समस्या होणार, असे चित्र सध्याचे आहे.भीमा नदी सध्या अतिशय मरणासन्न अवस्थेत आहे. अशा नद्या पाणी नव्हे, तर विष वाहून नेत आहेत. या विषयुक्त नद्यांनी आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

अनेक गावांच्या पाणी योजना नदीवरून आहेत. मुळात नद्यांचे दूषित पाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांचा अभाव यांमुळे दूषित पाण्याचाच पुरवठा होत आहे.नागरिकांमधील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेपर्वाई यांमुळे नदी प्रदूषण अधिक गतीने होत आहे.नद्यांमध्ये थेट टाकण्यात येणारा कचरा आणि थेट सोडण्यात येणारे सांडपाणी, मैलामिश्रित पाणी यांमुळे नद्यांची वाईट अवस्था झाली आहे. 

टॅग्स :Puneपुणे