शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भवानीनगर, बारामती तापले !

By admin | Updated: March 19, 2016 02:40 IST

भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरात शुक्रवारी (दि. १८) ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे, तर बारामती शहर परिसरात ३७.५ अंश

बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरात शुक्रवारी (दि. १८) ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे, तर बारामती शहर परिसरात ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याचे चित्र आहे. परिणामी पीकवाढीचे चक्र बिघडण्याची भीती कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.यंदाच्या दुष्काळाने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तीव्र स्वरूप धारण केले आहे. जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. नीरा डावा कालव्यास पाणी नसल्याने विंधनविहिरीदेखील कोरड्या पडल्या आहेत. त्यातच दुष्काळाने पाण्याची उन्हाची दाहकता असह्य करून टाकली आहे. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात येथील पारा कमाल ४२ अंशांवर पोहोचला. तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तापमापक केंद्रावर कमाल ४२ अंश सेल्सिअस नोंद झाली, तर बारामती शहर परिसरात संपूर्ण महिनाभर ३४ ते ३५ अंशांपर्यंत असणारे तापमान गेल्या तीन-चार दिवसांत ३७.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर कमाल तापमानाची १८.९ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. यंदाचा उन्हाळा अधिक दमछाक करणारा ठरणार आहे. कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)- ऊसपिकावर १५ दिवसांच्या अंतराने २ टक्के पोटॅश फवारणी करावी. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. शक्य त्या ठिकाणी पाचट पसरावे. - उसाला सायंकाळी ६ नंतर पाणी द्यावे. दिवसा पाणी देणे टाळावे. वारा असल्यानंतर पाणी देऊ नये. उष्णतेच्या तीव्रतेवर बाष्पीभवनाचा वेग अवलंबून असतो. - लागवड केलेल्या पहिल्या तीन महिन्यातील उसावर तापमानवाढीचा परिणाम होण्याची भीती अधिक आहे. तर बांधणी केलेल्या उसाची पाण्याचा ताण सहन करण्याची अधिक क्षमता असते.- नवीन फळबाग लागवडीवर आच्छादन करावे. रासायनिक खतांचा वापर टाळावा. सेंद्रिय, द्रवरूप खतांचा वापर अधिक उत्तम आहे.वाढत्या तापमानाबरोबरच पिकांच्या पानांच्या रंध्रातून बाष्पीभवनाचा वेगदेखील वाढला आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीच्या चक्रावर विपरित परिणाम होणार आहे़ उष्णतेच्या तीव्रतेने पिकांची वाढ खुंटते. - बी. एस. घुले, कृषितज्ज्ञ