शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

भवानीनगर, बारामती तापले !

By admin | Updated: March 19, 2016 02:40 IST

भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरात शुक्रवारी (दि. १८) ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे, तर बारामती शहर परिसरात ३७.५ अंश

बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरात शुक्रवारी (दि. १८) ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे, तर बारामती शहर परिसरात ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याचे चित्र आहे. परिणामी पीकवाढीचे चक्र बिघडण्याची भीती कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.यंदाच्या दुष्काळाने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तीव्र स्वरूप धारण केले आहे. जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. नीरा डावा कालव्यास पाणी नसल्याने विंधनविहिरीदेखील कोरड्या पडल्या आहेत. त्यातच दुष्काळाने पाण्याची उन्हाची दाहकता असह्य करून टाकली आहे. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात येथील पारा कमाल ४२ अंशांवर पोहोचला. तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तापमापक केंद्रावर कमाल ४२ अंश सेल्सिअस नोंद झाली, तर बारामती शहर परिसरात संपूर्ण महिनाभर ३४ ते ३५ अंशांपर्यंत असणारे तापमान गेल्या तीन-चार दिवसांत ३७.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर कमाल तापमानाची १८.९ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. यंदाचा उन्हाळा अधिक दमछाक करणारा ठरणार आहे. कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)- ऊसपिकावर १५ दिवसांच्या अंतराने २ टक्के पोटॅश फवारणी करावी. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. शक्य त्या ठिकाणी पाचट पसरावे. - उसाला सायंकाळी ६ नंतर पाणी द्यावे. दिवसा पाणी देणे टाळावे. वारा असल्यानंतर पाणी देऊ नये. उष्णतेच्या तीव्रतेवर बाष्पीभवनाचा वेग अवलंबून असतो. - लागवड केलेल्या पहिल्या तीन महिन्यातील उसावर तापमानवाढीचा परिणाम होण्याची भीती अधिक आहे. तर बांधणी केलेल्या उसाची पाण्याचा ताण सहन करण्याची अधिक क्षमता असते.- नवीन फळबाग लागवडीवर आच्छादन करावे. रासायनिक खतांचा वापर टाळावा. सेंद्रिय, द्रवरूप खतांचा वापर अधिक उत्तम आहे.वाढत्या तापमानाबरोबरच पिकांच्या पानांच्या रंध्रातून बाष्पीभवनाचा वेगदेखील वाढला आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीच्या चक्रावर विपरित परिणाम होणार आहे़ उष्णतेच्या तीव्रतेने पिकांची वाढ खुंटते. - बी. एस. घुले, कृषितज्ज्ञ