शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

भाटघर धरणातून पुन्हा विसर्ग

By admin | Updated: December 21, 2015 00:42 IST

भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे

भोर : भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन भविष्यात धरण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी आवश्यक एवढेच पाणी सोडले जावे. तसेच बेकायदेशिररीत्या सुरू असलेला पाण्याचा विर्सग थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाटघर धरण भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.भाटघर धरण भागातील संगमनेर, माळवाडी, ब्राह्मणघर, गोरड, म्हशीवली, हर्णस, मळे, करंदी बुद्रुक, डेरे, सांगवी हि. मा., म्हाळवडी या गावांतील ७४४ नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भाटघर धरणात गेल्या वर्षी धरणात या महिन्यात ३० टक्के कमी पाणीसाठा होता. मागील २२ दिवसांपासून धरणातून २ हजार ५९९ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडल्याने धरणात ५४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील चार मोऱ्यांतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी बंद करून माळवाडी गावाकडील बाजूच्या मोऱ्यांतून पाणी सोडले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)