शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाटघर धरणातून पुन्हा विसर्ग

By admin | Updated: December 21, 2015 00:42 IST

भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे

भोर : भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन भविष्यात धरण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी आवश्यक एवढेच पाणी सोडले जावे. तसेच बेकायदेशिररीत्या सुरू असलेला पाण्याचा विर्सग थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाटघर धरण भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.भाटघर धरण भागातील संगमनेर, माळवाडी, ब्राह्मणघर, गोरड, म्हशीवली, हर्णस, मळे, करंदी बुद्रुक, डेरे, सांगवी हि. मा., म्हाळवडी या गावांतील ७४४ नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भाटघर धरणात गेल्या वर्षी धरणात या महिन्यात ३० टक्के कमी पाणीसाठा होता. मागील २२ दिवसांपासून धरणातून २ हजार ५९९ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडल्याने धरणात ५४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील चार मोऱ्यांतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी बंद करून माळवाडी गावाकडील बाजूच्या मोऱ्यांतून पाणी सोडले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)