शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

भाटघरमधून विसर्ग वाढविला

By admin | Updated: November 26, 2015 01:01 IST

आधीच १० ते १५ दिवस लवकर पाणी सोडले. सोमवारी १,३५० क्युसेक्सने होणारा विसर्ग मंगळवारी अचानक २,५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीपात्रात सोडण्यात आले

भोर : आधीच १० ते १५ दिवस लवकर पाणी सोडले. सोमवारी १,३५० क्युसेक्सने होणारा विसर्ग मंगळवारी अचानक २,५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. यंदा तालुक्याला लवकर टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील तीन मोऱ्यांतून पाणी सोडले आहे. पूर्वेकडील भागाला सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सदरचे पाणी सोडल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. यावर्षी ७० टक्केच पाणीसाठा आहे. पुरंधर तालुक्यातील वीर धरणात ४० टक्केच पाणीसाठा असून, तेथून डाव्या व उजव्या कालव्यातून १२ दिवसांपासून पाणी खाली सोडण्यात आले आहे. त्यामुळे वीर धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे रविवारी नीरादेवघर धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी खाली सोडले होते. मात्र, धरणग्रस्तांनी सदरचे पाणी बंद केले. मग सोमवारी भाटघर धरणातून सुरुवातीला १३५० क्युसेक्सने व मंगळवारी २५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीत सोडण्यात येत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून २ हजार क्युसेक्सने पाणी खाली सोडण्याचे ठरले होते. मात्र, वीजनिर्मिती केंद्रात बिघाड असल्याचे कारण सांगत इरिगेशन गेटमधील तीन मोऱ्यांतून २५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीत सोडले आहे. ६०० क्युसेक्स पाणी जादा सोडण्यात येत आहे. जादा पाणी सोडण्याच्या हेतून फक्त पावसाळ्यात वापरले जाणारे गेट उघडून पाणी सोडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)