शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

भाटघरमधून विसर्ग वाढविला

By admin | Updated: November 26, 2015 01:01 IST

आधीच १० ते १५ दिवस लवकर पाणी सोडले. सोमवारी १,३५० क्युसेक्सने होणारा विसर्ग मंगळवारी अचानक २,५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीपात्रात सोडण्यात आले

भोर : आधीच १० ते १५ दिवस लवकर पाणी सोडले. सोमवारी १,३५० क्युसेक्सने होणारा विसर्ग मंगळवारी अचानक २,५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. यंदा तालुक्याला लवकर टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील तीन मोऱ्यांतून पाणी सोडले आहे. पूर्वेकडील भागाला सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सदरचे पाणी सोडल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. यावर्षी ७० टक्केच पाणीसाठा आहे. पुरंधर तालुक्यातील वीर धरणात ४० टक्केच पाणीसाठा असून, तेथून डाव्या व उजव्या कालव्यातून १२ दिवसांपासून पाणी खाली सोडण्यात आले आहे. त्यामुळे वीर धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे रविवारी नीरादेवघर धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी खाली सोडले होते. मात्र, धरणग्रस्तांनी सदरचे पाणी बंद केले. मग सोमवारी भाटघर धरणातून सुरुवातीला १३५० क्युसेक्सने व मंगळवारी २५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीत सोडण्यात येत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून २ हजार क्युसेक्सने पाणी खाली सोडण्याचे ठरले होते. मात्र, वीजनिर्मिती केंद्रात बिघाड असल्याचे कारण सांगत इरिगेशन गेटमधील तीन मोऱ्यांतून २५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीत सोडले आहे. ६०० क्युसेक्स पाणी जादा सोडण्यात येत आहे. जादा पाणी सोडण्याच्या हेतून फक्त पावसाळ्यात वापरले जाणारे गेट उघडून पाणी सोडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)