शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

भास्कराचार्यांनी गणिताची केली ‘कविता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:11 IST

पुणे : “गणितासारखा रुक्ष विषय भास्कराचार्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला. फलज्योतिषऐवजी गणितज्योतिष्यावर त्यांनी भर दिला. ग्रहणाबद्दलची भीती ...

पुणे : “गणितासारखा रुक्ष विषय भास्कराचार्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला. फलज्योतिषऐवजी गणितज्योतिष्यावर त्यांनी भर दिला. ग्रहणाबद्दलची भीती घालवली. गणित मनोरंजकरीत्या मांडले. गणिताची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली हे योगदान अभूतपूर्व आहे,” असे प्रतिपादन गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी केले.

‘अंकनाद’तर्फे आयोजित थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ या ग्रंथावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. प्राची साठे यांनी वेबिनारमध्ये प्रास्ताविक केले. मंदार नामजोशी, पराग गाडगीळ, निर्मिती नामजोशी, समीर बापट आदी यात सहभागी झाले होते.

डॉ. आगरकर म्हणाले की परदेशात ब्राझीलपासून अनेक ठिकाणी भास्कराचार्याच्या गणित सूत्राचा उल्लेख होतो. देशात देखील हा अभ्यास व्हायला हवा. ‘भास्कर प्रथम’ हे सातव्या शतकात होऊन गेले. ‘त्रिकोणमिती’मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नावाने भारताने उपग्रह सोडला आहे. तर भास्कराचार्य हे बाराव्या शतकात होऊन गेले. गणित आणि खगोलशास्त्रात त्यांनी योगदान दिले. त्यांच्याही नावे उपग्रह सोडण्यात आला.

वयाच्या ३६ व्या वर्षी भास्कराचार्य यांनी ‘सिद्धांत शिरोमणी’ ग्रंथ लिहिला. गणितासारखा रुक्ष विषय त्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला. भास्कराचार्य यांच्यानंतर भारतीय गणिताची अधोगती झाली. पुढे जगात भास्कराचार्यांच्या लिखाणावर संशोधन सुरु झाले. जळगावच्या पाटण येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गणिताची ‘भास्कर नगरी’ उभारण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती डॉ आगरकर यांनी दिली.