शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

भरत शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:11 IST

पाटील-शहा परिवाराचे पाटील-शहा परिवाराचे पुन्हा मनोमिलन? इंदापूर : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज ...

पाटील-शहा परिवाराचे

पाटील-शहा परिवाराचे पुन्हा मनोमिलन?

इंदापूर : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भरत शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे विरोधकांच्या गोटात चाललेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भरत शहा पुन्हा स्वगृही परतल्याचे मानले जात आहे. पाटील शहा परिवाराचे पुन्हा मनोमिलन झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव पदाचे मुकुंद शहा यांच्या सहीचे अधिकार काढून घेतल्याने त्यांचे बंधू भरत शहा यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून पाटील-शहा परिवाराचे खटकले होते अशी चर्चा होती. मात्र, शंकरराव बाजीराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू असणारे गोकुळदास (भाई) शहा यांचे पाटील कुटुंबासोबत खूप वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तसेच हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाच्या जडणघडणीमध्ये शहा कुटुंबाचा पूर्वीपासूनच मोठा वाटा आहे.

कारखान्याच्या संचालकपदाचा भरत शहा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने शहा यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. संपूर्ण तालुक्यात विविध तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढविले जात होते. मात्र, अखेरीस पाटील-शहा यांचा वाद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केलेल्या योग्य शिष्टाईमुळे मिटला आहे.

राजकारणात अप्पासाहेब जगदाळे हे दिलेले शब्द पाळणारे नेते आहेत. हे सर्वांना परिचित आहे. जगदाळे यांनी शहा यांच्या घरी जाऊन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी शहा कुटुंबाने पुढे यावे अशी विनंती केल्याचे समजते. त्यानंतर भरत शहा यांनी शुक्रवारी ( दि.२४ ) कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी नामनिर्देशन अर्जाच्या अखेरीस इंदापूर ऊस उत्पादक गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून विरोधकांना धक्का दिला आहे.

------------------------ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अर्ज दाखल

कर्मयोगी कै. शंकरराव पाटील यांनी असंख्य अडचणीतून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. यामध्ये कारखान्याच्या स्थापनेपासून आमचे काका गोकुळशेठ शहा आजतागायत सोबत राहिले आहेत. राजकारण हा विषय वेगळा आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी साखर कारखानदारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी सभासदांचा उमेदवारी भरण्यासाठी मागील एक महिन्यापासूनचा आग्रह मी टाळू शकलो नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम काम करीत राहणार असल्याची ग्वाही भरत शहा यांनी उमेदवार अर्ज भरताना दिली.

फोटो ओळी : इंदापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना भरत शहा.

२४०९२०२१-बारामती-०६

-----------------------------------