शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

भामा-आसखेडचा तिढा सुटला

By admin | Updated: March 31, 2016 03:05 IST

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेले भाम-आसखेड धरण ते पुण्यापर्यंतच्या पाइपलाइनचे काम अखेर रविवार, ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर

पुणे : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेले भाम-आसखेड धरण ते पुण्यापर्यंतच्या पाइपलाइनचे काम अखेर रविवार, ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांचे पुनर्वसन तातडीने करावे; तसेच शेतकऱ्यांनी या पाइपलाइनचे काम थांबवू नये, असा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.भामा-आसखेड प्रकल्पाचे काम आळंदी, खेड, चाकण परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे थांबले होते. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार शरद गोरे व इतर नेत्यांकडून केले जात होते. या पार्श्वभूमीवर महापौर प्रशांत जगताप यांनी या प्रश्नांबाबत उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव, सुरेश गोरे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, माजी आमदार बापू पठारे व महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेली बैठक यशस्वी ठरली असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.जगताप यांनी सांगितले, ‘ठाकरे यांच्यासमोर भामा-आसखेडचा प्रश्न ठेवला असता, पुणेकरांचे पाणी आपल्याला अडवायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून, ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, असे सांगितले. भामा-आसखेडचे काम लगेच चालू व्हायला हवे, याबाबत त्यांनी शिवाजीराव आढळराव व सुरेश गोरे यांना सूचना केल्या. पाइपलाइनला टॅब देऊन आळंदीला पाणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याची माहिती या वेळी देण्यात आली. विधिमंडळामध्ये जाऊन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेली पुनर्वसनाच्या आराखड्याची फाइल आल्यास त्याला एका दिवसात मंजुरी देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनीही दिले आहे. भामा-आसखेड धरणामधून २०० एमएलडी पाणी आपल्याला मिळणार आहे. आळंदीसाठी पाइपलाइनला टॅब दिल्यास, इतर गावांकडूनही तशी मागणी होऊ शकते. त्यामुळे पुणे शहराला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे आळंदीसाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकली जाणार आहे.’नगररस्ता परिसरातील अनेक भागांना सध्या अपुरा पाणीपुरवठा होत आहे. भामा-आसखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा नगर रोड परिसराला केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भामा-आसखेड प्रकल्पाला उशीर होत असल्याने त्या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला होता. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीमुळे या पाइपलाइनचे थांबलेले काम पुन्हा सुरू होणार आहे.(प्रतिनिधी)महापालिकेचे ४ कोटी रुपये वाचले भामा-आसखेड प्रकल्पाबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये आळंदी नगर परिषदेला पुणे महापालिकेने ४ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आळंदी नगर परिषदेला ४ कोटी रुपये देण्याचा भार पुणे महापालिकेवर पडणार नसल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.