शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

भामा-आसखेड जलवाहिनी वाद शिगेला

By admin | Updated: June 23, 2017 04:43 IST

नागरिकांचा प्रचंड विरोध असताना देखील पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असणारे भामा आसखेड जलवाहिनीचे आणि धरणात सुरू असणारे जॅकवेलचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : नागरिकांचा प्रचंड विरोध असताना देखील पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असणारे भामा आसखेड जलवाहिनीचे आणि धरणात सुरू असणारे जॅकवेलचे काम आज प्रकल्पबाधित शेतकऱ्यानी बंद पाडले. आता या जलवाहिनी विरोधात निर्णायक लढाई लढणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. आमच्यावर मावळप्रमाणे गोळीबार केला तरी चालेल पण आमच्या हक्काच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.आसखेड फाटा परिसरात सुरू असणारे जलवाहिनी टाकण्याचे काम आणि भामा आसखेड धरणाच्या जलाशयात सुरू असणारे जॅकवेलचे काम संतप्त प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी बंद पाडले.भामा आसखेड प्रकल्पामधील मधील १४१४ प्रकल्पग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करा, १०० टक्के शेतकऱ्यांना पाणी परवाने द्या, कालवे रद्द केल्याने लाभ क्षेत्र रद्द करून जमिनीवरील संपादनाचे शिक्के काढा, प्रकल्पग्रस्तांना दाखले द्यावेत, भविष्यात धरणाची उंची वाढणार नाही याची लेखी हमी द्यावी, अशा विविध मागण्या प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि गावोगावच्या शेतकऱ्यांंनी मांडल्या. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पुणे शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या जलवाहिनीचे आणि जॅकवेलचे काम करू द्यायचे नाही असा पवित्रा या प्रकल्पग्रस्त नागरिकांनी घेतला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जी महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे त्यात वारंवार काम बंद करून अडथळा येत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, आमदार महेश लांडगे, जगदीश मुळीक, सुरेश गोरे यांच्यासह अधिकारी वर्गाची करंजविहिरे येथे बैठक घेतली व त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी केलेल्या घोषणा फसव्या असून त्यात आजतागायत काहीही कार्यवाही झाली नाही तसेच त्या बैठकीत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना बोलू दिले नाही असाही सूर शेतकऱ्यांचा आहे. या आंदोलनादरम्यान पुणे महानगरपालिकेच्या प्रवीण गेडाम, कडू यांनी आंदोलकांना फोन करून काम सुरू ठेवण्याचे आवाहन केल. तर याच वेळी भाजपच्या एका संघटन मंत्र्याला फोन लावून देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.जॅकवेलच्या कामाच्या ठिकाणी आयटीडी कंपनीचे राजेंद्र कामठे, अभिजीत नाईक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आज जॅकवेलचे काम बंद करताना सत्यवान नवले, माजी सरपंच किसन नवले, ग्रामपंचायत सदस्य किसन नवले, तानाजी नवले, बबन नवले, नामदेव पानमंद, कचरू देशमुख, माऊली जाधव, हरीचंद्र गोपाळे, विजय नवले, पप्पू नवले, तुकाराम नवले, लक्ष्मण नवले आदी उपस्थित होते.पुढाऱ्यांनी केले हात वर ? : निवडणूक आली की जनतेच्या बाजूने गोडगोड बोलायचे याचा खास प्रत्यय भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतक?यांना येत आहे. निवडणूकी अगोदर आम्ही अमुक करू तमुक करू असे बोलणारे पुढारी आता शेतकऱ्यांना सोडून बाजूला झाल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला विरोध करणारी जहाल शिवसेना अचानक मवाळ कशी झाली ? सत्ताधारी भाजपा काही बोलत का नाही? विरोधी असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मुद्द्यावर न बोलता लांबूनच शेतकऱ्यांचा आक्रोश पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणताही नेता भांडताना दिसत नाही.