शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेड जलवाहिनी वाद शिगेला

By admin | Updated: June 23, 2017 04:43 IST

नागरिकांचा प्रचंड विरोध असताना देखील पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असणारे भामा आसखेड जलवाहिनीचे आणि धरणात सुरू असणारे जॅकवेलचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : नागरिकांचा प्रचंड विरोध असताना देखील पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असणारे भामा आसखेड जलवाहिनीचे आणि धरणात सुरू असणारे जॅकवेलचे काम आज प्रकल्पबाधित शेतकऱ्यानी बंद पाडले. आता या जलवाहिनी विरोधात निर्णायक लढाई लढणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. आमच्यावर मावळप्रमाणे गोळीबार केला तरी चालेल पण आमच्या हक्काच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.आसखेड फाटा परिसरात सुरू असणारे जलवाहिनी टाकण्याचे काम आणि भामा आसखेड धरणाच्या जलाशयात सुरू असणारे जॅकवेलचे काम संतप्त प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी बंद पाडले.भामा आसखेड प्रकल्पामधील मधील १४१४ प्रकल्पग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करा, १०० टक्के शेतकऱ्यांना पाणी परवाने द्या, कालवे रद्द केल्याने लाभ क्षेत्र रद्द करून जमिनीवरील संपादनाचे शिक्के काढा, प्रकल्पग्रस्तांना दाखले द्यावेत, भविष्यात धरणाची उंची वाढणार नाही याची लेखी हमी द्यावी, अशा विविध मागण्या प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि गावोगावच्या शेतकऱ्यांंनी मांडल्या. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पुणे शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या जलवाहिनीचे आणि जॅकवेलचे काम करू द्यायचे नाही असा पवित्रा या प्रकल्पग्रस्त नागरिकांनी घेतला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जी महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे त्यात वारंवार काम बंद करून अडथळा येत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, आमदार महेश लांडगे, जगदीश मुळीक, सुरेश गोरे यांच्यासह अधिकारी वर्गाची करंजविहिरे येथे बैठक घेतली व त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी केलेल्या घोषणा फसव्या असून त्यात आजतागायत काहीही कार्यवाही झाली नाही तसेच त्या बैठकीत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना बोलू दिले नाही असाही सूर शेतकऱ्यांचा आहे. या आंदोलनादरम्यान पुणे महानगरपालिकेच्या प्रवीण गेडाम, कडू यांनी आंदोलकांना फोन करून काम सुरू ठेवण्याचे आवाहन केल. तर याच वेळी भाजपच्या एका संघटन मंत्र्याला फोन लावून देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.जॅकवेलच्या कामाच्या ठिकाणी आयटीडी कंपनीचे राजेंद्र कामठे, अभिजीत नाईक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आज जॅकवेलचे काम बंद करताना सत्यवान नवले, माजी सरपंच किसन नवले, ग्रामपंचायत सदस्य किसन नवले, तानाजी नवले, बबन नवले, नामदेव पानमंद, कचरू देशमुख, माऊली जाधव, हरीचंद्र गोपाळे, विजय नवले, पप्पू नवले, तुकाराम नवले, लक्ष्मण नवले आदी उपस्थित होते.पुढाऱ्यांनी केले हात वर ? : निवडणूक आली की जनतेच्या बाजूने गोडगोड बोलायचे याचा खास प्रत्यय भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतक?यांना येत आहे. निवडणूकी अगोदर आम्ही अमुक करू तमुक करू असे बोलणारे पुढारी आता शेतकऱ्यांना सोडून बाजूला झाल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला विरोध करणारी जहाल शिवसेना अचानक मवाळ कशी झाली ? सत्ताधारी भाजपा काही बोलत का नाही? विरोधी असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मुद्द्यावर न बोलता लांबूनच शेतकऱ्यांचा आक्रोश पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणताही नेता भांडताना दिसत नाही.