शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

असंख्य दिव्यांनी उजळला भीमाकाठ

By admin | Updated: November 15, 2016 03:34 IST

येथील भीमानदी काठावरील कार्तिकेयस्वामींच्या मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या असंख्य पणत्यांनी भीमाकाठ आणि मंदिर परिसर

राजगुरुनगर : येथील भीमानदी काठावरील कार्तिकेयस्वामींच्या मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या असंख्य पणत्यांनी भीमाकाठ आणि मंदिर परिसर उजळून निघाला होता. राजगुरुनगर भाविकांनी त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. विशेषत: महिला वर्ग भीमानदी काठावरील कार्तिकेय मंदिरात आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कार्तिकेय मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने जमला होता. भीमानदी काठावरील कार्तिकेय मंदिराच्या परिसरात कार्तिकेयभक्तांनी आणि भाऊ राक्षे मित्र मंडळाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हा दीपमहोत्सव आयोजित केला होता. त्यासाठी शंभरावर भक्तगण त्रिपुर वातींनी तेलाच्या पणत्या लावण्यासाठी झटत होते. त्यानंतर रात्रीचा अंधार पसरताच दिव्यांनी हा भीमाकाठ उजळून निघला. येथील स्मशानभूमीही दिव्यांनी उजळून निघाली होती. भाविकांनी भीमा नदीत पणत्या सोडल्या. येथे अनेक भाविकांनी कार्तिकेयस्वामींचे दर्शन घेतले. त्यांत महिला अधिक होत्या. कारण फक्त आजच्या दिवशीच महिलांना कार्तिकेयस्वामींचे दर्शन घेता येते, अशी परंपरा आहे. कार्तिकस्वामींचे मोर हे वाहन असल्याने मोराची पिसे कार्तिकेय स्वामींसमोर ठेवून नंतर घरी नेऊन पूजा करून जपून ठेवले जाते. त्यामुळे धनसंपदा लाभते, अशी श्रद्धा आहे. सकाळी कार्तिकेयांची महापूजा आणि अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. भाविकांसाठी भाऊ राक्षे मित्र मंडळाने महाप्रसादाचे आयोजनही केले होते. पौराणिक सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या कार्तिकेयस्वामी मंदिरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त सकाळपासून गर्दी होती. असंख्य महिलांनी मोराचे पीस वाहून दर्शन घेतले. भागीरथी कुंड आणि मंदिर परिसर हजारो पणत्या लावून उजळून काढला. सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने हा दीपसोहळा आयोजित करण्यात आला होता. ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ सांडभोर यांनी व्यवस्था पाहिली.