शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

साखर उद्योगासाठी सर्वतोपरी प्रयत्न

By admin | Updated: October 28, 2015 01:20 IST

कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

शिरगाव : कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. कासारसाई- दारुंब्रे (ता. मावळ) येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी श्री संत तुकाराममहाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष हभप शांताराममहाराज मोरे यांच्या आधिपत्याखाली पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माजी खासदार अशोक मोहळ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे, श्रीमती रूपलेखा ढोरे, सविता दगडे, कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, माऊली शिंदे, अंकुश आंबेकर, पांडुरंग ठाकर, धैर्यशील ढमाले, चंद्रकांत लोहिरे, स्वाती भेगडे, कुंद विनोदे, मुख्य कार्यकारी संचालक एन. पी. दुर्वे, कार्यकारी संचालक साहेबराव पठारे आदी उपस्थित होते. बापट म्हणाले की, शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या फायद्यासाठी प्रदीर्घ काळासाठी योजना राबविण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासारख्या पाणी बचत करणाऱ्या पद्धतीचा वापर करावा, शासन ठिबक सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी मंत्री पाटील म्हणाले की, साखर उद्योग ही महाराष्ट्राची सर्वांत मोठी ओळख असून, ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी साखर कारखान्यांची मोठी भूमिका आहे.शिवतरे म्हणाले की, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. (प्रतिनिधी)