शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

साखर उद्योगासाठी सर्वतोपरी प्रयत्न

By admin | Updated: October 28, 2015 01:20 IST

कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

शिरगाव : कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. कासारसाई- दारुंब्रे (ता. मावळ) येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी श्री संत तुकाराममहाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष हभप शांताराममहाराज मोरे यांच्या आधिपत्याखाली पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माजी खासदार अशोक मोहळ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे, श्रीमती रूपलेखा ढोरे, सविता दगडे, कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, माऊली शिंदे, अंकुश आंबेकर, पांडुरंग ठाकर, धैर्यशील ढमाले, चंद्रकांत लोहिरे, स्वाती भेगडे, कुंद विनोदे, मुख्य कार्यकारी संचालक एन. पी. दुर्वे, कार्यकारी संचालक साहेबराव पठारे आदी उपस्थित होते. बापट म्हणाले की, शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या फायद्यासाठी प्रदीर्घ काळासाठी योजना राबविण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासारख्या पाणी बचत करणाऱ्या पद्धतीचा वापर करावा, शासन ठिबक सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी मंत्री पाटील म्हणाले की, साखर उद्योग ही महाराष्ट्राची सर्वांत मोठी ओळख असून, ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी साखर कारखान्यांची मोठी भूमिका आहे.शिवतरे म्हणाले की, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. (प्रतिनिधी)