शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगासाठी सर्वतोपरी प्रयत्न

By admin | Updated: October 28, 2015 01:20 IST

कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

शिरगाव : कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. कासारसाई- दारुंब्रे (ता. मावळ) येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी श्री संत तुकाराममहाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष हभप शांताराममहाराज मोरे यांच्या आधिपत्याखाली पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माजी खासदार अशोक मोहळ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे, श्रीमती रूपलेखा ढोरे, सविता दगडे, कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, माऊली शिंदे, अंकुश आंबेकर, पांडुरंग ठाकर, धैर्यशील ढमाले, चंद्रकांत लोहिरे, स्वाती भेगडे, कुंद विनोदे, मुख्य कार्यकारी संचालक एन. पी. दुर्वे, कार्यकारी संचालक साहेबराव पठारे आदी उपस्थित होते. बापट म्हणाले की, शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या फायद्यासाठी प्रदीर्घ काळासाठी योजना राबविण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासारख्या पाणी बचत करणाऱ्या पद्धतीचा वापर करावा, शासन ठिबक सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी मंत्री पाटील म्हणाले की, साखर उद्योग ही महाराष्ट्राची सर्वांत मोठी ओळख असून, ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी साखर कारखान्यांची मोठी भूमिका आहे.शिवतरे म्हणाले की, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. (प्रतिनिधी)