शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

आधी धरणे, सेझ आता रेल्वेमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: पुणे-नाशिक रेल्वे मार्गिकेसाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी नोटीसा देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर: पुणे-नाशिक रेल्वे मार्गिकेसाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी नोटीसा देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या रेल्वे मार्गाच्या चिंतेने शेतकरी हतबल झाला आहे. टाकळकरवाडी, होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी येथील भूमिपुत्रांच्या रेल्वेच्या मार्गासाठी जमिनी जाणार आहे. पूर्वी धरणे आणि सेझसाठी जमिनी गेल्या, आता रेल्वेचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पुन्हा स्वार झाले असून, शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

खेड तालुक्यांमध्ये अनेक प्रकल्प आले, २००७ मध्ये खेड तालुक्याच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आला. त्या वेळी शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. अनेक वेळा शेतकऱ्यांनी आंदोलन, उपोषण, मोर्च काढले. तरीही उद्याप काही प्रश्न बाकी आहे. १५ टक्के परताव्याचा प्रश्न अजून ही भिजत पडला आहे. याबाबत स्थानिकाचा पाठपुरवा सुरू आहे. पूर्व भागात सेझ प्रकल्पाच्या जागेत विमानतळ होणार, असे शासनाने जाहीर केले गेले. कित्येक वर्षे या परिसरात विमानतळ होणार अशा घोषणा प्रशासनाने केेल्या. दरम्यान पाईट, पाळू या परिसरात विमानतळ होणार असे प्रशासनाने जाहीर करून या जागेची पाहणी करण्यात आली. पुन्हा सेझ जागेतच विमानतळ होणार असे जाहीर करण्यात आले. पुन्हा शेतकऱ्यांनी विमानतळ हटाव, शेतकरी बचाव अशी भूमिका घेत विमानतळास विरोध केला. प्रशासनाने ही जागा विमानतळास योग्य नसल्याचे जाहीर करून विमानतळ पुरंदर येथे नेण्यात आले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आंदोलन केले, तसेच आता पुणे-नाशिक महामार्गासाठी राजगुरुनगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्यामुळे बाह्यवळण रस्ता भांबुरवाडी-टाकळकरवाडी झनझन स्थळ, होलेवाडी या परिसरातून गेले आहे हे काम रखडले होते. मात्र, पुन्हा एकदा वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांना या जमिनीचा मोबदला मिळाला. पण, काही शेतकरी शेतजमिनी गेल्यामुळे भूमिहीन झाले आहेत. दरम्यान, त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली होती. १५ वर्षापूर्वी पुणे- नाशिक रेल्वेचे फेर सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी शिरूर तालुक्यातील पाबळ, मलठण या ठिकाणांहून रेल्वमार्ग जाणार होता. त्यातच काही महिन्यापूर्वी घोषणा झाली पुणे-नाशिक रेल्वे मार्ग देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार असून, या मार्गावर ताशी २२० कि.मी. वेगाने रेल्वे धावणार आहे. रेल्वेने प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण केले आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची नव्याने आखणी सुरू करण्यात आली. त्यानुसार आधीच्या मार्गात बदल करून नवीन मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रशासनाने जमिनची मोजणी करून शेतजमीन ताब्यात घेण्यास सुरुवात करणार आहे. मात्र, रेल्वबाधित शेतकऱ्यांना मिळणार भाव तुटपुंजा आहे. तसेच, या परिसरात सेझ प्रकल्प, लगतच असलेले राजगुरूनगर शहराचे बाह्यवळण त्यामुळे या परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रशासन सांगते की, रेडीरेकनरच्या चार ते पाच पट पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, सरकारी खरेदीखत यांची रक्कम कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या भागातील शेतकरी आंदोलन करण्यास उतरणार असे चित्र दिसत आहे.