शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
4
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
5
IND vs AUS : "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
6
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
7
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
8
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
9
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
10
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
11
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
12
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
13
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
14
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
15
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
16
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
17
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
18
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
19
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
20
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 

‘व्हर्च्युअल’ विद्वेषापासून सावध राहावे

By admin | Updated: March 28, 2017 23:50 IST

देशाची सुरक्षा ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची तेवढीच जबाबदारी असल्याचे मत

कोणत्याही धर्मामध्ये दहशतवादाची शिकवण देण्यात येत नाही. मानवी मूल्ये जतन करण्यासाठी धर्माची स्थापना झालेली असते. मात्र, काही प्रवृत्ती धर्माच्या आधारे समाजामध्ये विद्वेष पसरवतात. तरुणांना वैचारिक जाळ्यात अडकवून कट्टरतावादाकडे वळवतात. दहशतवादाकडे आकर्षित होणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. संयमाने आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. देशाची सुरक्षा ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची तेवढीच जबाबदारी असल्याचे मत दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.पुणे : ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून धार्मिक कट्टरतावाद पसरवला जात आहे. याला कोणत्याही धर्माचा अपवाद राहिलेला नाही. या व्हर्च्युअल विद्वेषापासून नागरिकांनी सावध राहणे आणि यंत्रणांना वेळीच सावध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद ही आपल्यापुढील मोठी आव्हाने आहेत. सुशिक्षित तरुणांना धर्माचा चुकीचा अर्थ सांगितला जात आहे. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचे काम सुरू आहे. दहशतवादविरोधी पथकाने अशा प्रकारे कट्टरतावादाकडे झुकत चाललेल्या तरुणांना परावृत्त करण्याचे कामही हाती घेतले आहे. त्यासाठी त्या त्या धर्मातील धर्मगुरूंची मदत घेतली जाते. या तरुणांवर गुन्हे दाखल न करता त्यांना समजावून सांगून पुन्हा प्रवाहामध्ये आणले जात आहे. गेल्या काही दिवसांत इसिसमध्ये जाऊ पाहणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, त्यांचे समुपदेशन करून परावृत्त करण्यात यश आले आहे. इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेकडून निर्माण झालेले वैचारिक परिणाम अधिक घातक आहेत. ‘लोन वोल्फ’ रोखणे हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. पुण्यातली एक सोळा वर्षीय तरुणी इसिसकडे आकर्षित झाली होती. तिचे मन परिवर्तन घडवून आणण्यात यश आले. पुण्यामध्ये मुस्लिम मौलवींच्या मोठ्या स्तरावर बैठका घेण्यात आल्या. यासोबतच शहराच्या विविध भागांत जनजागृती सभा घेऊन तरुणांना दहशतवादाचे खरे स्वरूप समजावून सांगण्यात आले. एटीएसकडून महाविद्यालयांमध्येही व्याख्यानांचे आयोजन करुन तरुणांना याविषयी जागरूक करण्यात येत आहे. देशात आणि जगभरात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांचा अभ्यास करण्यात येतो. त्यांच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून त्याला कशा प्रकारे रोखता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतात. कोणत्याही प्रकारचा ‘अलर्ट’ हा नेहमी गांभीर्याने घेतला जातो. पोलिसांकडून कधीही राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केला जात नाही. दहशतवाद या विषयामध्ये अधिक ‘स्पेशलायझेशन’ येण्याची आवश्यकता नक्कीच आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर शासनाने पोलिसांना अधिक चांगली शस्त्रास्त्रे, साहित्य उपलब्ध करून दिले आहे. चर्चासत्रे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोलिसांना दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच असे हल्ले रोखण्यासाठी तयार करण्यात येते. सोशल मीडिया हे देशविघातक प्रवृत्तींच्या हातामध्ये लागलेले एकप्रकारचे हत्यारच आहे. कोणीही विदेशात बसून आपल्याकडे दंगली भडकावू शकतो. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट पाहून नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यानंतर जमाव हिंसक होत जातो. वास्तविक या प्रवृत्तींना जे हवे आहे तेच आपण करतो. अशा पोस्टपासून सावध राहणे, त्याची माहिती पोलिसांना आणि अन्य यंत्रणांना देणे, वेळीच अशा पोस्ट डिलीट करणे, त्याला प्रतिवाद करणे आवश्यक आहे. यामध्ये नागरिकांनी पुढाकार घेतला तर अनेक अनुचित घटना टाळता येतील.अलीकडच्या काळात शहरी भागांमध्ये पाय पसरू पाहात असलेला नक्षलवाद आणि त्याची विचारसरणी ही चिंतेची बाब आहे. आर्थिक दुर्बल घटकांना हेरुन त्यांच्या मनात व्यवस्थेविषयी राग निर्माण करुन तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुणे एटीएसने यासंदर्भात काही कारवायाही पुण्यामध्ये केल्या आहेत. पोलिसांना नागरिकांनीही माहिती दिल्यास अशा अनेक घटना टाळता येतील.