शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

सदाचाराने वाटचाल करत आत्मनिर्भर व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST

पुणे : पदवीधरांनी यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवत मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. त्यातूनच नवा ...

पुणे : पदवीधरांनी यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवत मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. त्यातूनच नवा भारत निर्माण होईल. तसेच सदाचाराने वाटचाल करत आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यीपीठाचा तिसरा दीक्षान्त समारंभ ऑनलाईन पद्धतीने पार पडला. या वेळी कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास इस्त्रोचे माजी संचालक डॉ. के. राधाकृष्णन, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटी ग्रुपचे कार्याध्यक्ष राहुल कराड, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुचित्रा नागरे-कराड, डॉ. सुनील कराड, स्वाती चाटे-कराड, डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश देशपांडे, डॉ. जब्बार पटेल, दीपक शिकारपूर, परीक्षा विभागाचे प्रमुख ज्ञानदेव निलवर्ण उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व पदवी प्रमाणपत्र दिले. तसेच पीएच.डी. व सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कोश्यारी म्हणाले, सध्या आपण आर्टिफिशल इंटेलिजेशनच्या गोष्टी करतो, मात्र संत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञ आणि वेद हेच खरा अर्थ सांगतात. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि डिझाईन व अन्य कोणत्याही शाखेचे शिक्षण घेत असताना अध्यात्माचा अभ्याससुध्दा करावा. आत्मनिर्भरतेचा विचार करत नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या यशस्वी जीवनासाठी उपयोग करावा. नोकरीसाठी शिक्षण न घेता भविष्यात इतरांना नोकरी देणारे म्हणून पुढे यावे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. याचा योग्य उपयोग करून भारताच्या विकासाला हातभार लावावा.