शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

शासकीय योजनांसाठी सकारात्मक राहा : बर्डे

By admin | Updated: November 28, 2015 00:44 IST

महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम गावोगावी होत असतानाही त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाही

नसरापूर : महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम गावोगावी होत असतानाही त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाही, याबाबत खंत व्यक्त करून भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांनी शासकीय योजनांसाठी सकारात्मक राहा, असे आवाहन नागरिकांना नसरापूर येथे केले. महसूल विभागाच्या वतीने नसरापूर व परिसरातील गावांकरिता येथील जानकीराम मंगल कार्यालयात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे, तहसीलदार वर्षा शिंगण, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, भोरच्या सभापती नंदा शेडगे, उपसभापती रोहिणी बागल, नसरापूरचे सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, उपसरपंच सुमन घाटे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, माजी सभापती कृष्णाजी रांजणे, मंडलाधिकारी राजेंद्र कडू, सुधीर तेलंग व सहभागी गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, वन कर्मचारी उपस्थित होते.यावर प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत जनतेला वेठीस धरले जाणार नाही, स्थगिती असताना सातबारे झाले असतील किंवा पुनर्वसनाबाबत कोणतेही प्रश्न असतील तर शेतकऱ्यांनी माझ्या कार्यालयात येऊन भेटावे, त्यावर निश्चित मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही दिली.तहसीलदार वर्षा शिंगण म्हणाल्या, की पाणंद रस्त्यासाठी मी स्वत: त्या ठिकाणी येईल. मात्र नागरिकांनी आपापसातील वाद मिटवले पाहिजेत. रस्ता सर्वांसाठीच उपयोगाचा असतो. निव्वळ दुसऱ्याला विरोध करून आपण आपलेदेखील नुकसान करत असतो. त्यासाठी नकारात्मक विचार सोडले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.