शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

पाणीपुरवठ्याबाबत योग्य काळजी घ्या

By admin | Updated: June 30, 2015 23:07 IST

पुरंदरमध्ये मागील आठवड्यात पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा आहे. पावसामुळे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्ध करूनच पाणीपुरवठा करण्यात यावा

सासवड : पुरंदरमध्ये मागील आठवड्यात पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा आहे. पावसामुळे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्ध करूनच पाणीपुरवठा करण्यात यावा, ज्या विहिरींचे पाणी घ्यावयाचे आहे त्या विहिरीत औषधे टाकण्यात यावीत, आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा ठेवावा तसेच आरोग्य पथके तयार करावीत, पुरवठा विभागाने दर वर्षीप्रमाणे गॅस व रॉकेल पुरवठा करावा, विद्युत वितरण कंपनीने उघड्या फ्युजबॉक्सची दुरुस्ती करावी, पोलिसांनी वाहतूक व्यवस्था योग्य ठेवावी, त्याचे नियोजन करावे यांसारख्या सूचना प्रशासनाने पालखीसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १२ जुलै रोजी पुरंदर तालुक्यात येत आहे. हा सोहळा सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असणार आहे.याबरोबरच जेजुरी, वाल्हे आदी ठिकाणीही पालखीचा मुक्काम असणार आहे. या सोहळ्यासाठी तालुक्यात योग्य व्यवस्था ठेवण्याबाबत पुरंदर -दौंडचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली सासवड तहसील कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी पोलीस विभाग, पाटबंधारे विभाग, सासवड-जेजुरी नगरपालिका, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, महावितरण, एसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, तहसीलदार संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)