शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

बैलगाडा शर्यतीवरून श्रेयाची लढाई

By admin | Updated: April 10, 2017 01:46 IST

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर या यशाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाची

पिंपळवंडी : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर या यशाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाची लढाई सध्या जोरात सुरू असून, या श्रेयवादाच्या लढाईत बाजी कोण मारणार, हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. सध्या सोशल मीडियावरून याचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे.जुन्नर, आंबेगाव, खेड या तीन तालुक्यांत जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या बैलगाडाशर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती. या बंदीमुळे ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यामुळे बैलगाडा शौकीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. इतकेच नाही तर ग्रामीण भागातील जत्रांवरही याचा परिणाम दिसून आला. या बंदीमुळे जत्रांमध्ये होणारी आर्थिक उलाढाल मंदावली. आपल्या पोटच्या मुलापेक्षाही बैलांना जिवापाड जपणारा शेतकरी या निर्णयामुळे खचला. कारण लाखो रुपये किमतीचे बैल काही हजार रुपयांमध्ये विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकरणात लक्ष घातले. बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली तसेच लोकसभेत बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविण्याची मागणी केली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही बैलगाडामालक संघटनेच्या माध्यमातून वारंवार बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही पाठपुरावा सुरु करत आपले संपूर्ण वर्चस्व पणाला लावले. राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल करून ते विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडले. या विधेयकास दोन्हीही सभागृहातील विरोधी पक्षांनीही विरोध न करता मंजुरी देऊन बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेतले. (वार्ताहर)शर्यत सुरू होणार हेच महत्त्वाचे बैलगाडा शर्यत सुरू करण्याचे श्रेय कुणीही घ्या; बैलगाडा शर्यत सुरू होणार हे चांगलं झालं, अशी बोलकी प्रतिक्रिया एका बैलगाडामालकाने दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलगाडा शर्यत सुरू झाली हे महत्त्वाचे आहे. राजकीय नेते मात्र श्रेयवादातच अडकलेले दिसून येत आहे.