शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा शर्यतीवरून श्रेयाची लढाई

By admin | Updated: April 10, 2017 01:46 IST

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर या यशाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाची

पिंपळवंडी : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर या यशाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाची लढाई सध्या जोरात सुरू असून, या श्रेयवादाच्या लढाईत बाजी कोण मारणार, हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. सध्या सोशल मीडियावरून याचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे.जुन्नर, आंबेगाव, खेड या तीन तालुक्यांत जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या बैलगाडाशर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती. या बंदीमुळे ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यामुळे बैलगाडा शौकीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. इतकेच नाही तर ग्रामीण भागातील जत्रांवरही याचा परिणाम दिसून आला. या बंदीमुळे जत्रांमध्ये होणारी आर्थिक उलाढाल मंदावली. आपल्या पोटच्या मुलापेक्षाही बैलांना जिवापाड जपणारा शेतकरी या निर्णयामुळे खचला. कारण लाखो रुपये किमतीचे बैल काही हजार रुपयांमध्ये विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकरणात लक्ष घातले. बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली तसेच लोकसभेत बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविण्याची मागणी केली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही बैलगाडामालक संघटनेच्या माध्यमातून वारंवार बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही पाठपुरावा सुरु करत आपले संपूर्ण वर्चस्व पणाला लावले. राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल करून ते विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडले. या विधेयकास दोन्हीही सभागृहातील विरोधी पक्षांनीही विरोध न करता मंजुरी देऊन बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेतले. (वार्ताहर)शर्यत सुरू होणार हेच महत्त्वाचे बैलगाडा शर्यत सुरू करण्याचे श्रेय कुणीही घ्या; बैलगाडा शर्यत सुरू होणार हे चांगलं झालं, अशी बोलकी प्रतिक्रिया एका बैलगाडामालकाने दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलगाडा शर्यत सुरू झाली हे महत्त्वाचे आहे. राजकीय नेते मात्र श्रेयवादातच अडकलेले दिसून येत आहे.