शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी व्यवसायातून मिळविला जगण्याचा आधार

By admin | Updated: February 18, 2017 02:57 IST

ग्रामीण भागातील शेतकरी, मेंढपाळ यांची गरज ओळखून त्यांना आवश्यक असणारी कोपरी व्यवसायाची निवड रुई (ता. इंदापूर) गावातील काहींनी केली.

सतीश सांगळे / कळसग्रामीण भागातील शेतकरी, मेंढपाळ यांची गरज ओळखून त्यांना आवश्यक असणारी कोपरी व्यवसायाची निवड रुई (ता. इंदापूर) गावातील काहींनी केली. या व्यवसायाला बाबीर यात्रेत मिळालेली प्रसिद्धी आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. कोपरी वापरणारा एक वेगळा ग्राहक असल्याने याची मागणी अखंडपणे राहणार आहे. वर्षभरात या व्यवसायाच्या माध्यमातून गृहिणींनी लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.सुमारे तीन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले रुई हे गाव आहे. खडकवासला कालव्याच्या पाण्यामुळे जिराईत जमिनीचे बागायत जमिनीत रूपांतर झाले. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून येथील ग्रामस्थ स्थिरावले आहेत. कधीकाळी गावातील नागरिक रोजगारासाठी गावोगावी भटकंती करत असत, त्या काळातही येथील काहींनी आपला स्वत:च्या व्यवसायास प्राधान्य दिले. कोपरी शिलाईकाम करणाऱ्या व्यावसायिकांची सुमारे २० कुटुंबे आहेत. मुंबई, दिल्ली येथून परदेशी जुने कपडे किलोप्रमाणे खरेदी करुन त्यापासून कोपरी शिलाई करण्याचे काम येथे केले जाते. या कामाचा मोठा आधार येथील गृहिणींना मिळाला आहे. येथील बाळू मारकड व काही जणांकडून हा व्यवसाय चालविला जात आहे. मुंबई, दिल्ली येथून परदेशातून आलेले नायलॉन, पॉलिस्टर सुताचे जुने कपडे खरेदी करुन त्यापासून कोपऱ्या शिवण्याचे काम करण्यात येते. ३० ते ४० रुपये प्रतिकिलो या दराने हे कपडे खरेदी केले जातात. त्यापासून टिकाऊ व मजबूत कोपऱ्या शिवण्याचे काम करणारी येथे सुमारे २० कुटुंबे आहेत. या कोपऱ्यांना ग्रामीण भागातील शेतकरी व मेंढपाळवगार्तून मागणी टिकून आहे. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक आधार४गावातील काही कापलेले कापड व धागा त्या शिलाई करणाऱ्या महिलांना देऊन त्यांना प्रतिकोपरी काही मोबदला दिला जात आहे. त्यामुळे सध्या या महिला दिवसाकाठी पंधरा ते वीस कोपऱ्या शिवत आहेत. केवळ कोपरीच्या उलाढालीचा विचार केल्यास वर्षभरात तीस लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल येथे होते. गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतही कोपरीच्या माध्यमातून या महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.४सध्या सुरू होणाऱ्या यात्रा-जत्रांच्या हंगामात अशा कोपऱ्यांना अधिक मागणी असते. शिवाय वर्षभर भरणारे बैलबाजार, शेळ्यामेंढ्यांच्या बाजारातही कोपऱ्या विक्रेत्यांची दुकाने पाहायला मिळतात. मजबूत कापड, प्रशस्त व अधिक खिसे यामुळे कोपऱ्या वापरणारा वेगळा ग्राहकवर्ग आहे. ४सध्या ग्राहकांची ही पसंती ओळखून या व्यावसायिकांनी रंगीबेरंगी कोपऱ्या शिवण्यास प्राधान्य दिले आहे. ग्राहकांकडून या रंगीत कोपऱ्यांना मागणी आहे.