शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना मिळेनात मूलभूत सुविधा

By admin | Updated: March 21, 2016 00:31 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या औद्योगिक परिसरात रासायनिक दूषित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि अग्निशमन दलाची जागा मंजूर होऊनही

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या औद्योगिक परिसरात रासायनिक दूषित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि अग्निशमन दलाची जागा मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही. उद्योजक आणि कामगारांना पाणी टंचाईचा सामना बारा महिने करावा लागत आहे. महापालिकेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या एमआयडीसीच्या उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उद्योग क्षेत्रातून नाराजी व्यक्त आहे. भोसरी आणि चिंचवड भागात एमआयडीसी आहे. तसेच तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी, शांतीनगर, आनंदनगर, गुळवेवस्ती आदी भागांत मध्यम आणि लघु उद्योग आहेत. एमआयडीसी महापालिकेकडे १९८२ला हस्तांतरित झाली. महापालिकेला एकूण महसूल करापैकी ३० ते ४० टक्के कर औद्योगिक परिसरातून मिळतो. मात्र, या क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.महापालिका उद्योजकांकडून ४ टक्के मलनिस्सारण कर वसूल केला जातो. मात्र, या भागात भूमिगत गटार योजना नाही. मध्यम व लघु उद्योगांमध्ये जमा झालेले रसायनमिश्रित दूषित सांडपाणी सेफ्टी टँकमध्ये जमा करावे लागते. टँकर बोलावून त्यांची व्यवस्था लावली जाते. काही उद्योगांतून थेट उघड्या गटारात हे सांडपाणी सोडले जाते. गटाराची नियमित सफाई होत नसल्याने ते तुंबून वाहतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शुद्धीकरण प्रकल्पासाठी २१०३ला एमआयडीसीने गवळी माथाजवळील जागा महापालिकेस दिली. मात्र, या संदर्भात काहीच कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर कचरा नियमितपणे उचलला जात नाही. येथील कुंड्या काढून नेल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. एखादी आगीची घटना घडल्यास त्वरित अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध व्हावेत म्हणून दोन ते तीन ठिकाणी अग्निशामक दलाच्या केंद्रास महापालिकेने मंजुरी दिली होती. सेक्टर दहामधील ब्लॉक एफ- टू येथे केंद्राची जागा आरक्षित केली. मात्र, अजून काहीही कार्यवाही झालेली नाही. कुदळवाडी परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, प्रशासनाची निष्क्रियता कायम आहे. सेक्टर क्रमांक ७/१० या औद्योगिक परिसरात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे खासगी टँकरने पाणी मागवावे लागते. येथे बहुतेक उद्योग आॅटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित आहेत. पाण्याचा वापर कामगार पिण्यासाठी करतात. तरीही येथे व्यापारी दराने पाणीपुरवठा केला जातो. रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. औद्योगिक परिसरात अनधिकृत झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याच ठिकाणी बेकायदेशीर भंगार दुकाने आहेत. उद्योगांकडून चोरी केलेला माल या जवळच्या दुकानात नेऊन विकला जातो. त्यामुळे चोऱ्याची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)