शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

उद्योजकांना मिळेनात मूलभूत सुविधा

By admin | Updated: March 21, 2016 00:31 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या औद्योगिक परिसरात रासायनिक दूषित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि अग्निशमन दलाची जागा मंजूर होऊनही

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या औद्योगिक परिसरात रासायनिक दूषित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि अग्निशमन दलाची जागा मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही. उद्योजक आणि कामगारांना पाणी टंचाईचा सामना बारा महिने करावा लागत आहे. महापालिकेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या एमआयडीसीच्या उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उद्योग क्षेत्रातून नाराजी व्यक्त आहे. भोसरी आणि चिंचवड भागात एमआयडीसी आहे. तसेच तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी, शांतीनगर, आनंदनगर, गुळवेवस्ती आदी भागांत मध्यम आणि लघु उद्योग आहेत. एमआयडीसी महापालिकेकडे १९८२ला हस्तांतरित झाली. महापालिकेला एकूण महसूल करापैकी ३० ते ४० टक्के कर औद्योगिक परिसरातून मिळतो. मात्र, या क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.महापालिका उद्योजकांकडून ४ टक्के मलनिस्सारण कर वसूल केला जातो. मात्र, या भागात भूमिगत गटार योजना नाही. मध्यम व लघु उद्योगांमध्ये जमा झालेले रसायनमिश्रित दूषित सांडपाणी सेफ्टी टँकमध्ये जमा करावे लागते. टँकर बोलावून त्यांची व्यवस्था लावली जाते. काही उद्योगांतून थेट उघड्या गटारात हे सांडपाणी सोडले जाते. गटाराची नियमित सफाई होत नसल्याने ते तुंबून वाहतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शुद्धीकरण प्रकल्पासाठी २१०३ला एमआयडीसीने गवळी माथाजवळील जागा महापालिकेस दिली. मात्र, या संदर्भात काहीच कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर कचरा नियमितपणे उचलला जात नाही. येथील कुंड्या काढून नेल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. एखादी आगीची घटना घडल्यास त्वरित अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध व्हावेत म्हणून दोन ते तीन ठिकाणी अग्निशामक दलाच्या केंद्रास महापालिकेने मंजुरी दिली होती. सेक्टर दहामधील ब्लॉक एफ- टू येथे केंद्राची जागा आरक्षित केली. मात्र, अजून काहीही कार्यवाही झालेली नाही. कुदळवाडी परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, प्रशासनाची निष्क्रियता कायम आहे. सेक्टर क्रमांक ७/१० या औद्योगिक परिसरात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे खासगी टँकरने पाणी मागवावे लागते. येथे बहुतेक उद्योग आॅटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित आहेत. पाण्याचा वापर कामगार पिण्यासाठी करतात. तरीही येथे व्यापारी दराने पाणीपुरवठा केला जातो. रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. औद्योगिक परिसरात अनधिकृत झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याच ठिकाणी बेकायदेशीर भंगार दुकाने आहेत. उद्योगांकडून चोरी केलेला माल या जवळच्या दुकानात नेऊन विकला जातो. त्यामुळे चोऱ्याची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)