शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

शालाबाह्य मुलांना शासनाचा ‘आधार’

By admin | Updated: May 11, 2015 05:59 IST

शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेष मोहीम.

पुणे : शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेष मोहीम राबविली जाणार असून, प्रत्येक गावातील शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्याचे आधार कार्ड शाळेशी जोडले जाणार आहे. राज्य शासनाच्या नऊ विभागाच्या सहकार्याने नवीन शैक्षणिक वर्षापासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.शिक्षण हक्क कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटातील बालकाला शिक्षणाचा मोफत हक्क प्राप्त झाला. परंतु, आजही राज्यातील अनेक मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यामुळे शासन व विविध स्वयंसेवी संस्थांकडून या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांत सुमारे ६० हजार शालाबाह्य मुलांना शाळेपर्यंत घेऊन येण्यात शिक्षण विभागाला यश मिळाले. मात्र, आजही ६ ते १४ वर्षे वयोगटातील हजारो मुले रस्त्यावर भीक मागताना, तसेच ऊसतोडणी कामगारांबरोबर आणि तमाशा कलावंताबरोबर भटकताना दिसतात. त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातीमधील डोंबारी, कुडमुडे जोशी, पारधी या समाजातील बरीच मुले शिक्षणापासून वंचित आहेत. परंतु,अशा अधिकाधिक शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करण्याची एक दिवसाची मोहीम राबविली जाणार आहे. सध्या नियमितपणे शाळेत जाणाऱ्या, परंतु आधार कार्ड नसलेल्या प्रत्येक मुलांचे आधार कार्ड काढण्याचा कालबद्ध कार्यक्रम शिक्षण विभागाने तयार केला आहे. आता शालाबाह्य मुलांचे आधारकार्डही तयार करून घेण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश दिला, तरी काही दिवसांनी या मुलांची शाळेतील उपस्थिती कमी होते अथवा काही दिवसांनी ही मुले शाळेत नियमितपणे गैरहजर राहतात. परिणामी, पुन्हा या मुलांचा शोध घ्यावा लागतो. मात्र, आता प्रत्येक शालाबाह्य मुलाचे असे आधारकार्ड काढून ते शाळांशी जोडले जाणार आहे. (प्रतिनिधी)