शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

शालाबाह्य मुलांना शासनाचा ‘आधार’

By admin | Updated: May 11, 2015 05:59 IST

शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेष मोहीम.

पुणे : शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेष मोहीम राबविली जाणार असून, प्रत्येक गावातील शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्याचे आधार कार्ड शाळेशी जोडले जाणार आहे. राज्य शासनाच्या नऊ विभागाच्या सहकार्याने नवीन शैक्षणिक वर्षापासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.शिक्षण हक्क कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटातील बालकाला शिक्षणाचा मोफत हक्क प्राप्त झाला. परंतु, आजही राज्यातील अनेक मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यामुळे शासन व विविध स्वयंसेवी संस्थांकडून या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांत सुमारे ६० हजार शालाबाह्य मुलांना शाळेपर्यंत घेऊन येण्यात शिक्षण विभागाला यश मिळाले. मात्र, आजही ६ ते १४ वर्षे वयोगटातील हजारो मुले रस्त्यावर भीक मागताना, तसेच ऊसतोडणी कामगारांबरोबर आणि तमाशा कलावंताबरोबर भटकताना दिसतात. त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातीमधील डोंबारी, कुडमुडे जोशी, पारधी या समाजातील बरीच मुले शिक्षणापासून वंचित आहेत. परंतु,अशा अधिकाधिक शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करण्याची एक दिवसाची मोहीम राबविली जाणार आहे. सध्या नियमितपणे शाळेत जाणाऱ्या, परंतु आधार कार्ड नसलेल्या प्रत्येक मुलांचे आधार कार्ड काढण्याचा कालबद्ध कार्यक्रम शिक्षण विभागाने तयार केला आहे. आता शालाबाह्य मुलांचे आधारकार्डही तयार करून घेण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश दिला, तरी काही दिवसांनी या मुलांची शाळेतील उपस्थिती कमी होते अथवा काही दिवसांनी ही मुले शाळेत नियमितपणे गैरहजर राहतात. परिणामी, पुन्हा या मुलांचा शोध घ्यावा लागतो. मात्र, आता प्रत्येक शालाबाह्य मुलाचे असे आधारकार्ड काढून ते शाळांशी जोडले जाणार आहे. (प्रतिनिधी)