शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

बारवर वाहतूक पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: December 31, 2014 00:51 IST

नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे.

मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे. तळीरामांना रोखण्यासाठी त्यांना एकट्याने वाहन चालवू देऊ नका किंवा सहकारी चालक द्या, असे फर्मान सोडल्यावर त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी हा पहारा ठेवण्यात येणार आहे.नवीन वर्षाचे स्वागत करताना तळीरामांकडून कुठलाही अपघात होऊ नये आणि मुळातच दारू पिऊन कुणीही वाहन चालवू नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष तयारी केली आहे. तळीरामांना रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी तर विशेष नियोजन करताना ७० ठिकाणी नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे शंभर वाहने आणि २०० मोटारसायकलची तयारी ठेवली असून, पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यंदा बार, परमिट रूम, बीअर शॉप यावर करडी नजर ठेवताना त्यांना विशेष सूचनाही केल्या आहेत. तसेच पार्किंगचा गोंधळ होऊ नये, यासाठीही सूचना केल्याचे सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याला शिव वाहतूक सेना नवीन वर्षाच्या जल्लोषात मद्यधुंद वाहन चालकांकडून होणारे अपघात टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांच्या सहकार्याला शिव वाहतूक सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.शेख यांनी सांगितले की, यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल १३ हजार ८९५ गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्याकडून ३ कोटी २१ लाखांचा दंड वसूल केला आहे. गतवर्षी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर १६ हजार ५२५ गुन्हे दाखल केले असून ३ कोटी ९३ लाखांचा दंड वसूल केला आहे. नवीन वर्षाच्या जल्लोषात या घटनांत वाढ होऊ नये याकरिता शिव वाहतूक सेनेनी ही भूमिका घेतल्याचे शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नववर्षाच्या स्वागता करताना भेसळयुक्त अथवा दुय्यम दर्जाच्या अन्नामुळे आनंदावर विरजण पडू नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाचे २०० अधिकारी सज्ज झाले आहेत. अन्न अधिकाऱ्यांना सज्ज राहायला सांगितले असून कारवाई करण्याचे आदेश प्रशासन आयुक्तांनी दिले आहेत. अन्नाचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण २४ तासांत देण्यात येणार आहे. हॉटेल, धाबे, पार्टीज, सामुदायिक कार्यक्रम इत्यादीवर हे अधिकारी विशेष लक्ष ठेवणार आहेत. येथे आवश्यक प्रकरणात आस्थापनांची सखोल तपासणी करून संशयित नमुने विश्लेषणासह घेऊन तातडीने मुंबई येथील प्रयोगशाळेत दुपारपासून घेण्यात येणार आहेत. या क्रमांकावर तक्रारी नोंदवू शकतात : मुंबई शहर व उपनगर - ज्ञानेश्वर महाले - ९६०४०८५४१, ०२२ - २६५९१२४९, टोल फ्री क्रमांक - १८००२२२३६५