शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

बारवर वाहतूक पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: December 31, 2014 00:51 IST

नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे.

मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे. तळीरामांना रोखण्यासाठी त्यांना एकट्याने वाहन चालवू देऊ नका किंवा सहकारी चालक द्या, असे फर्मान सोडल्यावर त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी हा पहारा ठेवण्यात येणार आहे.नवीन वर्षाचे स्वागत करताना तळीरामांकडून कुठलाही अपघात होऊ नये आणि मुळातच दारू पिऊन कुणीही वाहन चालवू नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष तयारी केली आहे. तळीरामांना रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी तर विशेष नियोजन करताना ७० ठिकाणी नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे शंभर वाहने आणि २०० मोटारसायकलची तयारी ठेवली असून, पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यंदा बार, परमिट रूम, बीअर शॉप यावर करडी नजर ठेवताना त्यांना विशेष सूचनाही केल्या आहेत. तसेच पार्किंगचा गोंधळ होऊ नये, यासाठीही सूचना केल्याचे सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याला शिव वाहतूक सेना नवीन वर्षाच्या जल्लोषात मद्यधुंद वाहन चालकांकडून होणारे अपघात टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांच्या सहकार्याला शिव वाहतूक सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.शेख यांनी सांगितले की, यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल १३ हजार ८९५ गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्याकडून ३ कोटी २१ लाखांचा दंड वसूल केला आहे. गतवर्षी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर १६ हजार ५२५ गुन्हे दाखल केले असून ३ कोटी ९३ लाखांचा दंड वसूल केला आहे. नवीन वर्षाच्या जल्लोषात या घटनांत वाढ होऊ नये याकरिता शिव वाहतूक सेनेनी ही भूमिका घेतल्याचे शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नववर्षाच्या स्वागता करताना भेसळयुक्त अथवा दुय्यम दर्जाच्या अन्नामुळे आनंदावर विरजण पडू नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाचे २०० अधिकारी सज्ज झाले आहेत. अन्न अधिकाऱ्यांना सज्ज राहायला सांगितले असून कारवाई करण्याचे आदेश प्रशासन आयुक्तांनी दिले आहेत. अन्नाचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण २४ तासांत देण्यात येणार आहे. हॉटेल, धाबे, पार्टीज, सामुदायिक कार्यक्रम इत्यादीवर हे अधिकारी विशेष लक्ष ठेवणार आहेत. येथे आवश्यक प्रकरणात आस्थापनांची सखोल तपासणी करून संशयित नमुने विश्लेषणासह घेऊन तातडीने मुंबई येथील प्रयोगशाळेत दुपारपासून घेण्यात येणार आहेत. या क्रमांकावर तक्रारी नोंदवू शकतात : मुंबई शहर व उपनगर - ज्ञानेश्वर महाले - ९६०४०८५४१, ०२२ - २६५९१२४९, टोल फ्री क्रमांक - १८००२२२३६५