शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

बारवर वाहतूक पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: December 31, 2014 00:51 IST

नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे.

मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे. तळीरामांना रोखण्यासाठी त्यांना एकट्याने वाहन चालवू देऊ नका किंवा सहकारी चालक द्या, असे फर्मान सोडल्यावर त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी हा पहारा ठेवण्यात येणार आहे.नवीन वर्षाचे स्वागत करताना तळीरामांकडून कुठलाही अपघात होऊ नये आणि मुळातच दारू पिऊन कुणीही वाहन चालवू नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष तयारी केली आहे. तळीरामांना रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी तर विशेष नियोजन करताना ७० ठिकाणी नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे शंभर वाहने आणि २०० मोटारसायकलची तयारी ठेवली असून, पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यंदा बार, परमिट रूम, बीअर शॉप यावर करडी नजर ठेवताना त्यांना विशेष सूचनाही केल्या आहेत. तसेच पार्किंगचा गोंधळ होऊ नये, यासाठीही सूचना केल्याचे सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याला शिव वाहतूक सेना नवीन वर्षाच्या जल्लोषात मद्यधुंद वाहन चालकांकडून होणारे अपघात टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांच्या सहकार्याला शिव वाहतूक सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.शेख यांनी सांगितले की, यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल १३ हजार ८९५ गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्याकडून ३ कोटी २१ लाखांचा दंड वसूल केला आहे. गतवर्षी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर १६ हजार ५२५ गुन्हे दाखल केले असून ३ कोटी ९३ लाखांचा दंड वसूल केला आहे. नवीन वर्षाच्या जल्लोषात या घटनांत वाढ होऊ नये याकरिता शिव वाहतूक सेनेनी ही भूमिका घेतल्याचे शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नववर्षाच्या स्वागता करताना भेसळयुक्त अथवा दुय्यम दर्जाच्या अन्नामुळे आनंदावर विरजण पडू नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाचे २०० अधिकारी सज्ज झाले आहेत. अन्न अधिकाऱ्यांना सज्ज राहायला सांगितले असून कारवाई करण्याचे आदेश प्रशासन आयुक्तांनी दिले आहेत. अन्नाचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण २४ तासांत देण्यात येणार आहे. हॉटेल, धाबे, पार्टीज, सामुदायिक कार्यक्रम इत्यादीवर हे अधिकारी विशेष लक्ष ठेवणार आहेत. येथे आवश्यक प्रकरणात आस्थापनांची सखोल तपासणी करून संशयित नमुने विश्लेषणासह घेऊन तातडीने मुंबई येथील प्रयोगशाळेत दुपारपासून घेण्यात येणार आहेत. या क्रमांकावर तक्रारी नोंदवू शकतात : मुंबई शहर व उपनगर - ज्ञानेश्वर महाले - ९६०४०८५४१, ०२२ - २६५९१२४९, टोल फ्री क्रमांक - १८००२२२३६५