शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जळीतग्रस्तांच्या मदतीसाठी अडथळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 02:17 IST

पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना मदत करण्यात नियोजनाचे व कागदपत्रांचे अडथळे येत आहेत.

पुणे : पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना मदत करण्यात नियोजनाचे व कागदपत्रांचे अडथळे येत आहेत. जळालेल्या घरांच्या संख्येबाबत सरकारी अधिकारी, महापालिका व स्थानिक कार्यकर्ते यांच्यात तफावत आहे. तसेच घरांची जागा निश्चित कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तीन दिवसांनंतरही सर्व जळीतग्रस्त अजूनही महापालिकेच्या शाळांमध्येच राहत असून, त्यांची स्वयंपाकाची, कपड्यांची व घर पुन्हा उभे करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची अशी सगळीच अडचण आहे.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, अन्य नगरसेवक यांनी जळीतग्रस्त २७० कुटुंबांना शनिवारी दुपारी भांडीवाटप केले. ५ ताटे, ५ वाट्या, तांब्या-भांडे अशी भांडी त्यांना वाटण्यात आली. त्याचबरोबर, त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. बाळासाहेब जानराव, स्थानिक नगरसेविका सोनाली लांडगे, परशुराम वाडेकर, अशोक शिरोळे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, शैलेश चव्हाण, हनुमंत साठे, महेश शिंदे, बाबूराव घाडगे, संतोष लांडगे, सुशील सर्वगौड, शोभा झेंडे, शांतिलाल चव्हाण, हलिमा शेख, संजय कदम, भगवान गायकवाड, नीलेश आल्हाट, सायबू चव्हाण, विशाल साळवे, रमेश तेलवडे, शशिकांत मोरे आदी या वेळी उपस्थित होते.यापूर्वी त्यांच्या वतीने ब्लँकेट तसेच कानटोप्यांचे वाटप करण्यात आले होते. अन्य काही स्वयंसेवी संस्था, संघटना, नगरसेवकांनीही अशी मदत केली आहे. डॉ. धेंडे म्हणाले, ‘‘घरे बांधण्यासाठी महापालिकेकडून वस्तुरूपात साधारण १५ हजार रुपयांची मदत करण्यात येते. त्यातून बांबू, पत्रे खरेदी करण्यात येतात. ही मदत अपुरी असल्यामुळे त्याची मर्यादा ५० हजार करावी, असा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे. मात्र, तो मंजूर व्हायला वेळ आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेने त्यांना या वस्तू खरेदी करून द्यायला हव्यात; मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे अजूनही या सर्वांना आश्रयासाठी शाळेतच राहावे लागत आहे.’’तहसीलदार तसेच महापालिकेच्या अधिकाºयांनी पाटील इस्टेटची महापालिकेत नोंद असलेली सन १९९५ची यादी आणली आहे, अशी माहिती देऊन डॉ. धेंडे म्हणाले, ‘‘त्यानंतर इतक्या वर्षांत इतके बदल झाले ते त्यांच्या गावीही नाहीत. त्यामुळे त्यांच्या नोंदीनुसार फक्त ९५ घरे जळाली आहेत. तर, स्थानिक कार्यकर्ते किमान २७० घरे जळाली असल्याचे सांगतात. त्यामुळे त्या जागेवर घरांची आखणी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवस्थित पंचनामा झाल्यानंतर या गोष्टी निश्चित होतील व त्यानंतरच घरांची उभारणी करता येईल.’’> लहान मुलांची अवस्था तर वाईट आहे. काय झाले आहे ते त्यांना अजूनही माहिती नाही. त्यामुळे ते दिवसभर शाळेत खेळत असतात. आई-वडील घर कसे उभे करायचे, या चिंतेत असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही.जळालेली जागा किमान स्वच्छ करण्याचे काम तरी पालिकेने करायला हवे होते. ते अजूनही केलेले नाही. त्यामुळे पुलावरून अनेक जण झोपडपट्टीकडे पाहत उभे असतात. घरांची अवस्था अत्यंत वाईट झाल्यामुळे व राखरांगोळी स्पष्ट दिसत असल्यामुळे अजूनही हे चित्र भीषण दिसत आहे.>पंचनाम्याचे काम सुरूपाटील इस्टेट परिसरातील झोपडपट्टीला लागलेल्या आगीमुळे सुमारे ९० ते १०० कुटुंबे बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल विभागाकडून जळालेल्या झोपडपट्ट्यांच्या पंचनाम्यांचे काम सुरू आहे. परंतु, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प विभाग आणि महसूल विभाग एकत्रितपणे पंचनामे करणार आहे.- डॉ. जयश्री कटारे,निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे>महापालिकेकडून हालचाली नाहीत : पंचनामे झाल्याशिवाय घरे बांधणार कशी ?महापालिका स्तरावर घरांच्या उभारणीबाबत अजूनही काही हालचाल झालेली नाही. तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामा करण्यात येत असतो. त्यांच्याकडून अद्याप हे काम झालेले नाही. त्यातूनच नक्की किती घरे जळाली व किती घरे बांधून द्यायची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय घरे बांधता येणार नाहीत, असे महापालिकेचे म्हणणे आहे. स्थानिक कार्यकर्ते आमच्या सांगण्याला सरकारीदरबारी काहीच किंमत दिली जात नाही, अशी तक्रार करतात. या सगळ्यात जळीतग्रस्त मात्र शाळेत कसेतरी मुक्काम करून आहेत. ते जळालेल्या घरांकडे जातात, तर तिथे महापालिकेने अद्याप काही स्वच्छतासुद्धा केलेली नाही. त्याचे कारणही पंचनामा झालेला नाही, असेच सांगण्यात येते. कपडालत्ता सगळेच जळाल्यामुळे या कुुटुंबांकडे जमिनीवर अंथरूण टाकण्याचीसुद्धा काहीच व्यवस्था नाही. मदत म्हणून मिळालेली ब्लँकेटच ते अंथरूण व पांघरूण म्हणून वापरत आहेत. काडीकाडी जमा करून उभा केलेला संसार जळाल्यामुळे बसलेल्या धक्क्यातून त्यांच्यातील अनेक महिला अजूनही बाहेर आलेल्या नाहीत.