शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

बारामतीचा पारा ४१ अंशांवर

By admin | Updated: April 16, 2016 03:50 IST

शहरात सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (दि. १५) चालू वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद ४१.२ अंश सेल्सिअस झाली.

बारामती : शहरात सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (दि. १५) चालू वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद ४१.२ अंश सेल्सिअस झाली. कालपर्यंत ३९ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान घुटमळणारा पारा आज थेट ४१ अंशांवर पोहोचला. गेल्या चार-पाच दिवसांपासून बारामतीचा पारा ४० अंशांच्या आसपासच घुटमळत आहे. गेल्या काही दिवसांत सकाळी ९ वाजल्यापासूनच प्रखर ऊन राहू लागले आहे. आग ओकणाऱ्या सूर्याचा अनुभव बारामतीकर घेत आहेत. भाजून काढणाऱ्या या तापमानामुळे शहरात सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागू होत आहे. एकीकडे वाढत्या तापमानाच्या फटक्यामुळे रस्ते निर्मनुष्य होत आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शुक्रवारी कमाल ४१.२, तर किमान २१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढते तापमान, गेल्या काही वर्षांपासून झालेल्या अत्यल्प पावसाचा परिणाम सर्वच घटकांवर जाणवत आहे. भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेली असून नदी-नाले कोरडे पडले आहेत. जिरायती भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात आहे. ३१ टँकरने या परिसरातील गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, नीरा डावा कालव्यालगतच्या विहिरींना दिलासा मिळाला आहे. कालव्याचे पाणी झिरपुन काही प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. प्रखर उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्र्या, रूमाल आदींचा वापर करूनच घराबाहेर पडावे लागत आहे. तर रसवंती गृह, शीतपेय केंद्रांमध्ये थंडावा मिळविण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. (प्रतिनिधी)वाढत्या तापमानामुळे पिकांवर विपरित परिणामवाढत्या तापमानामुळे पिकांवर विपरित परिणाम होण्याची भीती आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पिकांची पाण्याची गरज वाढणार आहे. ही गरज पूर्ण न झाल्यास पिके जळून जाण्याचा धोका संभवतो. एप्रिलच्या मध्यालाच पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. आपल्या परिसरात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान असते. मात्र, यंदा तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद अली यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.