शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

बारामतीची ‘कोंडी’ वाढतेय

By admin | Updated: October 27, 2015 00:52 IST

उदासीन पोलीस प्रशासनामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाबरोबरच नागरिक त्रस्त आहेत.

बारामती : उदासीन पोलीस प्रशासनामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाबरोबरच नागरिक त्रस्त आहेत. पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण, बेशिस्त वाहतुकीमुळे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीमुळे गर्दी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय तर प्रशासनाची दमछाक होणार आहे. पार्किंगची प्रभावी व्यवस्था उभारण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.सध्या केवळ भिगवण चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू आहे. मात्र, त्यामध्येदेखील सातत्य नसते. त्यामुळे भर चौकात होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी बनते. विशेषत: शहरातील शाळा सुटल्यानंतर सर्व वाहने या चौकात एकत्र येतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. त्यातून व्यापार पेठांमध्ये वाहतुकीच्या कोंडीचे चित्र कायमच दिसू लागले आहे. महावीर पथ येथे एकेरी वाहतूक करण्यास चारचाकी, तीनचाकी वाहनांना मुभा आहे. मात्र, गुणवडी चौकाच्या दिशेने बेशिस्त वाहने सुरूच असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी नियमित होत आहे.ती व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. शहरातील महत्त्वाची दुकाने या मार्गावर आहेत. त्यामुळे या मार्गावर बारामती शहरासह आसपासच्या गावांमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शहरातील सर्वाधिक गर्दीचा हा मार्ग आहे. या मार्गावर दुतर्फा दुचाकी लावल्या जातात. गांधी चौक ते गुणवडी चौकादरम्यान एकेरी वाहतूक आहे. गुणवडी चौकाच्या दिशेने जाण्यास चारचाकी, तीनचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी आहे. या बंदीचा फलक गांधी चौकात लावण्यात आला होता. याशिवाय वाहतूक पोलिसांचेदेखील त्यावर नियंत्रण होते. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे. एकेरी वाहतूक दर्शवणारा फलक येथून काढण्यात आला आहे. या ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण ठेवणारे पोलीस कर्मचारी अभावानेच दिसून येतात. त्यामुळे या मार्गावरील बेशिस्त वाहतूक वाढत आहे. त्यातून चुकीच्या दिशेने चारचाकी वाहनचालक जातात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यातून वाहनांची मोठी कोंडी होते. येथील एकेरी वाहतुकीचा फलक पूर्ववत लावण्यात यावा, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. एमआयडीसीतील पेन्सिल चौकात वेगळे चित्र नाही. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे; मात्र ही यंत्रणा बंद आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कंपनीमध्ये जाणारी अवजड वाहने, कामगार यामुळे चौकामध्ये अपघाताची भीती आहे. (प्रतिनिधी)