शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

बारामतीची ‘कोंडी’ वाढतेय

By admin | Updated: October 27, 2015 00:52 IST

उदासीन पोलीस प्रशासनामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाबरोबरच नागरिक त्रस्त आहेत.

बारामती : उदासीन पोलीस प्रशासनामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाबरोबरच नागरिक त्रस्त आहेत. पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण, बेशिस्त वाहतुकीमुळे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीमुळे गर्दी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय तर प्रशासनाची दमछाक होणार आहे. पार्किंगची प्रभावी व्यवस्था उभारण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.सध्या केवळ भिगवण चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू आहे. मात्र, त्यामध्येदेखील सातत्य नसते. त्यामुळे भर चौकात होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी बनते. विशेषत: शहरातील शाळा सुटल्यानंतर सर्व वाहने या चौकात एकत्र येतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. त्यातून व्यापार पेठांमध्ये वाहतुकीच्या कोंडीचे चित्र कायमच दिसू लागले आहे. महावीर पथ येथे एकेरी वाहतूक करण्यास चारचाकी, तीनचाकी वाहनांना मुभा आहे. मात्र, गुणवडी चौकाच्या दिशेने बेशिस्त वाहने सुरूच असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी नियमित होत आहे.ती व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. शहरातील महत्त्वाची दुकाने या मार्गावर आहेत. त्यामुळे या मार्गावर बारामती शहरासह आसपासच्या गावांमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शहरातील सर्वाधिक गर्दीचा हा मार्ग आहे. या मार्गावर दुतर्फा दुचाकी लावल्या जातात. गांधी चौक ते गुणवडी चौकादरम्यान एकेरी वाहतूक आहे. गुणवडी चौकाच्या दिशेने जाण्यास चारचाकी, तीनचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी आहे. या बंदीचा फलक गांधी चौकात लावण्यात आला होता. याशिवाय वाहतूक पोलिसांचेदेखील त्यावर नियंत्रण होते. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे. एकेरी वाहतूक दर्शवणारा फलक येथून काढण्यात आला आहे. या ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण ठेवणारे पोलीस कर्मचारी अभावानेच दिसून येतात. त्यामुळे या मार्गावरील बेशिस्त वाहतूक वाढत आहे. त्यातून चुकीच्या दिशेने चारचाकी वाहनचालक जातात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यातून वाहनांची मोठी कोंडी होते. येथील एकेरी वाहतुकीचा फलक पूर्ववत लावण्यात यावा, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. एमआयडीसीतील पेन्सिल चौकात वेगळे चित्र नाही. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे; मात्र ही यंत्रणा बंद आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कंपनीमध्ये जाणारी अवजड वाहने, कामगार यामुळे चौकामध्ये अपघाताची भीती आहे. (प्रतिनिधी)