शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

बारामतीची ‘कोंडी’ वाढतेय

By admin | Updated: October 27, 2015 00:52 IST

उदासीन पोलीस प्रशासनामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाबरोबरच नागरिक त्रस्त आहेत.

बारामती : उदासीन पोलीस प्रशासनामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाबरोबरच नागरिक त्रस्त आहेत. पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण, बेशिस्त वाहतुकीमुळे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीमुळे गर्दी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय तर प्रशासनाची दमछाक होणार आहे. पार्किंगची प्रभावी व्यवस्था उभारण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.सध्या केवळ भिगवण चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू आहे. मात्र, त्यामध्येदेखील सातत्य नसते. त्यामुळे भर चौकात होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी बनते. विशेषत: शहरातील शाळा सुटल्यानंतर सर्व वाहने या चौकात एकत्र येतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. त्यातून व्यापार पेठांमध्ये वाहतुकीच्या कोंडीचे चित्र कायमच दिसू लागले आहे. महावीर पथ येथे एकेरी वाहतूक करण्यास चारचाकी, तीनचाकी वाहनांना मुभा आहे. मात्र, गुणवडी चौकाच्या दिशेने बेशिस्त वाहने सुरूच असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी नियमित होत आहे.ती व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. शहरातील महत्त्वाची दुकाने या मार्गावर आहेत. त्यामुळे या मार्गावर बारामती शहरासह आसपासच्या गावांमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शहरातील सर्वाधिक गर्दीचा हा मार्ग आहे. या मार्गावर दुतर्फा दुचाकी लावल्या जातात. गांधी चौक ते गुणवडी चौकादरम्यान एकेरी वाहतूक आहे. गुणवडी चौकाच्या दिशेने जाण्यास चारचाकी, तीनचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी आहे. या बंदीचा फलक गांधी चौकात लावण्यात आला होता. याशिवाय वाहतूक पोलिसांचेदेखील त्यावर नियंत्रण होते. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे. एकेरी वाहतूक दर्शवणारा फलक येथून काढण्यात आला आहे. या ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण ठेवणारे पोलीस कर्मचारी अभावानेच दिसून येतात. त्यामुळे या मार्गावरील बेशिस्त वाहतूक वाढत आहे. त्यातून चुकीच्या दिशेने चारचाकी वाहनचालक जातात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यातून वाहनांची मोठी कोंडी होते. येथील एकेरी वाहतुकीचा फलक पूर्ववत लावण्यात यावा, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. एमआयडीसीतील पेन्सिल चौकात वेगळे चित्र नाही. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे; मात्र ही यंत्रणा बंद आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कंपनीमध्ये जाणारी अवजड वाहने, कामगार यामुळे चौकामध्ये अपघाताची भीती आहे. (प्रतिनिधी)