शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बारामती धुमसतेय!

By admin | Updated: March 31, 2016 02:59 IST

शहरातील कचरा डेपोला आग लागतेय की लावली जाते, असा प्रश्न आता नागरिकच विचारू लागले आहेत. शुक्रवारी लागलेली आग विझविली. तरीदेखील कचरा डेपोतून बाहेर पडणाऱ्या

बारामती : शहरातील कचरा डेपोला आग लागतेय की लावली जाते, असा प्रश्न आता नागरिकच विचारू लागले आहेत. शुक्रवारी लागलेली आग विझविली. तरीदेखील कचरा डेपोतून बाहेर पडणाऱ्या धुराच्या लोटाने दररोज सकाळी रिंगरोडला चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहेच. त्याचबरोबर या परिसरातील रहिवाशांनादेखील त्रास होऊ लागला आहे. आज पहाटे धुराचे लोट रस्त्यावर, नागरिकांच्या घरात होते. देसाई इस्टेटच्या परिसरापर्यंत धुराचे लोट होते. या भागातील इनडोअर स्टेडियममध्ये खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांना या धुराचा त्रास सहन करावा लागला. धुराचे लोट स्टेडियमच्या आतमध्ये घुसल्यामुळे खेळाडूंना खोकल्याचा त्रास झाला. त्याचबरोबर या धुरामुळे गुदमरल्यासारखे होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यापूर्वी कचरा डेपोला सतत आग लागत होती. तीन महिन्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आज पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत धुराचे लोट दिसत होते. दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होतील, अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी केली. विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाच दिवसांनंतरदेखील कचरा डेपो धुमसतच आहे. धुरामुळे नागरिकांना त्रास होतच आहे. या स्थितीत पालिकेकडून खास उपाययोजना केली जात नाही. आज धुराचे लोट बॅटमिंटन कोर्टमध्ये देखील आल्यामुळे खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना दिवसभर खोकल्याचा त्रास झाला आहे. घशामध्ये खवखव होत असल्याची तक्रार माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी यांच्यासह इतरांनी केली. धुराचे लोट अंबिकानगर, देसाई इस्टेट, रिंगरोड, श्रीरामनगर, सहयोग सोसायटी, दूध संघ वसाहत आदी ठिकाणी पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांना गेली पाच दिवस हा त्रास सहन करावा लागत आहे. आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यामुळे धूर वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. आगीमुळे कचरा डेपोमध्ये गॅसेस तयार होऊन आग लागत आहे. ती विझविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यावर धुराचे लोट पसरत आहे. दिवसभर धूर बाहेर पडत असतानाच रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे कचरा डेपो पुन्हा पेट घेत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी अग्निशमन दलाची गाडी तैनात ठेवली आहे. त्यामुळे आग लागल्याचे दिसताच पाण्याचा मारा केला जात आहे. कचरा ढीग मोठा असल्यामुळे आतून धुमसत असलेली आग विझली जात नाही. त्यामुळे धूर बाहेर पडतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मोठा खड्डा घेऊन कचरा गाडला जाणार आहे. तरच आगीवर नियंत्रण येईल. - नीलेश देशमुख , मुख्याधिकारी