शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बारामती धुमसतेय!

By admin | Updated: March 31, 2016 02:59 IST

शहरातील कचरा डेपोला आग लागतेय की लावली जाते, असा प्रश्न आता नागरिकच विचारू लागले आहेत. शुक्रवारी लागलेली आग विझविली. तरीदेखील कचरा डेपोतून बाहेर पडणाऱ्या

बारामती : शहरातील कचरा डेपोला आग लागतेय की लावली जाते, असा प्रश्न आता नागरिकच विचारू लागले आहेत. शुक्रवारी लागलेली आग विझविली. तरीदेखील कचरा डेपोतून बाहेर पडणाऱ्या धुराच्या लोटाने दररोज सकाळी रिंगरोडला चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहेच. त्याचबरोबर या परिसरातील रहिवाशांनादेखील त्रास होऊ लागला आहे. आज पहाटे धुराचे लोट रस्त्यावर, नागरिकांच्या घरात होते. देसाई इस्टेटच्या परिसरापर्यंत धुराचे लोट होते. या भागातील इनडोअर स्टेडियममध्ये खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांना या धुराचा त्रास सहन करावा लागला. धुराचे लोट स्टेडियमच्या आतमध्ये घुसल्यामुळे खेळाडूंना खोकल्याचा त्रास झाला. त्याचबरोबर या धुरामुळे गुदमरल्यासारखे होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यापूर्वी कचरा डेपोला सतत आग लागत होती. तीन महिन्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आज पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत धुराचे लोट दिसत होते. दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होतील, अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी केली. विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाच दिवसांनंतरदेखील कचरा डेपो धुमसतच आहे. धुरामुळे नागरिकांना त्रास होतच आहे. या स्थितीत पालिकेकडून खास उपाययोजना केली जात नाही. आज धुराचे लोट बॅटमिंटन कोर्टमध्ये देखील आल्यामुळे खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना दिवसभर खोकल्याचा त्रास झाला आहे. घशामध्ये खवखव होत असल्याची तक्रार माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी यांच्यासह इतरांनी केली. धुराचे लोट अंबिकानगर, देसाई इस्टेट, रिंगरोड, श्रीरामनगर, सहयोग सोसायटी, दूध संघ वसाहत आदी ठिकाणी पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांना गेली पाच दिवस हा त्रास सहन करावा लागत आहे. आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यामुळे धूर वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. आगीमुळे कचरा डेपोमध्ये गॅसेस तयार होऊन आग लागत आहे. ती विझविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यावर धुराचे लोट पसरत आहे. दिवसभर धूर बाहेर पडत असतानाच रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे कचरा डेपो पुन्हा पेट घेत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी अग्निशमन दलाची गाडी तैनात ठेवली आहे. त्यामुळे आग लागल्याचे दिसताच पाण्याचा मारा केला जात आहे. कचरा ढीग मोठा असल्यामुळे आतून धुमसत असलेली आग विझली जात नाही. त्यामुळे धूर बाहेर पडतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मोठा खड्डा घेऊन कचरा गाडला जाणार आहे. तरच आगीवर नियंत्रण येईल. - नीलेश देशमुख , मुख्याधिकारी