शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बारामती धुमसतेय!

By admin | Updated: March 31, 2016 02:59 IST

शहरातील कचरा डेपोला आग लागतेय की लावली जाते, असा प्रश्न आता नागरिकच विचारू लागले आहेत. शुक्रवारी लागलेली आग विझविली. तरीदेखील कचरा डेपोतून बाहेर पडणाऱ्या

बारामती : शहरातील कचरा डेपोला आग लागतेय की लावली जाते, असा प्रश्न आता नागरिकच विचारू लागले आहेत. शुक्रवारी लागलेली आग विझविली. तरीदेखील कचरा डेपोतून बाहेर पडणाऱ्या धुराच्या लोटाने दररोज सकाळी रिंगरोडला चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहेच. त्याचबरोबर या परिसरातील रहिवाशांनादेखील त्रास होऊ लागला आहे. आज पहाटे धुराचे लोट रस्त्यावर, नागरिकांच्या घरात होते. देसाई इस्टेटच्या परिसरापर्यंत धुराचे लोट होते. या भागातील इनडोअर स्टेडियममध्ये खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांना या धुराचा त्रास सहन करावा लागला. धुराचे लोट स्टेडियमच्या आतमध्ये घुसल्यामुळे खेळाडूंना खोकल्याचा त्रास झाला. त्याचबरोबर या धुरामुळे गुदमरल्यासारखे होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यापूर्वी कचरा डेपोला सतत आग लागत होती. तीन महिन्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आज पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत धुराचे लोट दिसत होते. दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होतील, अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी केली. विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाच दिवसांनंतरदेखील कचरा डेपो धुमसतच आहे. धुरामुळे नागरिकांना त्रास होतच आहे. या स्थितीत पालिकेकडून खास उपाययोजना केली जात नाही. आज धुराचे लोट बॅटमिंटन कोर्टमध्ये देखील आल्यामुळे खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना दिवसभर खोकल्याचा त्रास झाला आहे. घशामध्ये खवखव होत असल्याची तक्रार माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी यांच्यासह इतरांनी केली. धुराचे लोट अंबिकानगर, देसाई इस्टेट, रिंगरोड, श्रीरामनगर, सहयोग सोसायटी, दूध संघ वसाहत आदी ठिकाणी पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांना गेली पाच दिवस हा त्रास सहन करावा लागत आहे. आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यामुळे धूर वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. आगीमुळे कचरा डेपोमध्ये गॅसेस तयार होऊन आग लागत आहे. ती विझविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यावर धुराचे लोट पसरत आहे. दिवसभर धूर बाहेर पडत असतानाच रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे कचरा डेपो पुन्हा पेट घेत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी अग्निशमन दलाची गाडी तैनात ठेवली आहे. त्यामुळे आग लागल्याचे दिसताच पाण्याचा मारा केला जात आहे. कचरा ढीग मोठा असल्यामुळे आतून धुमसत असलेली आग विझली जात नाही. त्यामुळे धूर बाहेर पडतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मोठा खड्डा घेऊन कचरा गाडला जाणार आहे. तरच आगीवर नियंत्रण येईल. - नीलेश देशमुख , मुख्याधिकारी