शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बारामती-फलटण-लोणंद लोहमार्ग: भूसंपादनास एकरी ४८ लाख मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:09 IST

तालुक्यातील ४०० एकर जमिनीचे होणार संपादन

बारामती : बारामती-फलटण-लोणंद हा लोहमार्ग एकूण ६७ किमी लांबीचा आहे. त्यापैकी बारामती तालुक्यातून ३७ किमीचा लोहमार्ग जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील ४०० एकर जमिनी संपादन होणार आहेत. एकरी ४८ लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी ११५ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाकडून मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.बारामती-फलटण-लोणंद या नवीन होणाºया लोहमार्गाची भूसंपादन व खरेदी दस्त प्रक्रिया ३१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. या भूसंपादनाबाबतच्या प्रक्रियेची सुरुवात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत दुय्यम निबंधक कार्यालयात येथे लाटे माळवाडी या गावातील दिनकर मारुती नाळे यांच्या जमिनीचे खरेदी दस्त करून करण्यात आली. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.यावेळी बोलताना निकम म्हणाले, की या लोहमार्गामध्ये बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बºहाणपूर, कटफळ, नेपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कºहावागज, सावंतवाडी, तांदूळवाडी या गावांचा समावेश आहे. या मार्गावर तीन स्टेशन होणार असून हा लोहमार्ग एकूण ६७ किलोमीटरचा आहे. नेपतवळण, ढाकाळे, लाटे या ठिकाणी रेल्वे स्टेशन विकसित करणत येणार आहेत. या लोहमार्गापैकी ३७ किलोमीटरएवढा परिसर बारामती उपविभागाच्या हद्दीमध्ये आहे. या ३७ किलोमीटर परिसरामध्ये एकूण ४०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या कामासाठी २२५ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपये प्राप्त झाले असून केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये मिळणार आहेत. भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनी खासगी वाटाघाटीने खरेदी करण्यात येणार आहेत.जमिनीची रक्कम तात्काळ बँक खात्यात होणार जमाजमिनीची रक्कम तत्काळ संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. भूसंपादन केलेल्या सर्व जमिनी येत्या मार्चअखेरपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहेत. भविष्यात बारामती रेल्वे स्टेशन जंक्शन होणार आहे. या लोहमार्गामुळे नागरिकांची वेळेची व पैशांची बचत होऊन मालवाहतुकीस व शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच आज दिवसभरात एकूण ६५ खरेदी दस्तांचे कामकाज करण्यात येणार असल्याचे निकम यावेळी म्हणाले.बारामती-फलटण-लोणंद लोहमार्गाच्या बारामती तालुक्यातील ३७ किमी अंतरामध्ये १ हजार २०० बाधितांना मोबदला मिळणार आहे. यामध्ये घर, शेती, झाडे, विहिरी, विंधन विहिरी यांचा समावेश आहे. या बैठकीवेळी काही गावांतील ग्रामस्थांनी भूसंपादनाला विरोध दर्शवला. मात्र या लोहमार्गामुळे पुणे स्टेशनवरील बराचसा ताण कमी होणार आहे. दौंडहून थेट बारामतीमार्गे रेल्वेने दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे.

टॅग्स :Baramatiबारामती