शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एमआयडीसी जलवाहिनी पूर्ण

By admin | Updated: June 19, 2016 04:33 IST

बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला येथील उद्योगांचा, नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला

बारामती : बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला येथील उद्योगांचा, नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. याशिवाय नवीन जलवाहिनीमुळे पाणीचोरी थांबली आहे. ‘लोकमत’नेयाबाबत केलेल्य्ाा पाठपुराव्याला यश आले आहे.येथील एमआयडीसीतील उद्योगांना, नागरिकांना उजनी जलाशयाच्या पात्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, जीर्ण झालेल्या जलवाहिनीमुळे दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत असे. जलवाहिनी फोडून पाणीचोरीचे प्रकार वाढीस लागले होते. उद्योगांच्या मागणीच्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ उद्योजकांवर आली होती. ऐन उन्हाळ्यात उजनीतून पाणी सोडल्याने पाणीपातळी कमालीची घटली होती. तसेच ६ दिवस येथील पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे उद्योजक, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ‘लोेकमत’ने या प्रश्नाबाबत सतत वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेण्यात आली. सुमारे १६ कोटी रुपये निधी खर्च करून जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ४ कोटींचा निधी उजनी जलाशयातील जॅकवेलसाठी मंजूर करण्यात आला आहे. सध्या या जॅकवेलचे काम प्रगतिपथावर आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे सध्या प्रतिदिन ८ ते १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे उद्योगांना मागणीप्रमाणे पाणी मिळत आहे.बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.