शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
3
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
4
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
5
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
6
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
7
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
8
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
10
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
11
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
12
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
13
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
14
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
15
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
16
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
17
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
18
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
19
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
20
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील शेतकरी पुतळा उद्ध्वस्त

By admin | Updated: February 10, 2015 01:19 IST

बारामती नगरपालिकेच्या जागेतील पाण्याच्या टाकीचे स्थलांतर करून जागा बळकाविल्यानंतर ४० वर्षांपूर्वी लायन्स क्लबने

बारामती : बारामती नगरपालिकेच्या जागेतील पाण्याच्या टाकीचे स्थलांतर करून जागा बळकाविल्यानंतर ४० वर्षांपूर्वी लायन्स क्लबने पालिकेच्या जागेत उभारलेल्या उद्यानातील शेतकरी पुतळादेखील तोडून टाकला आहे. ही पुतळ्याची जागादेखील बळकाविणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी, हा पुतळा पाडून त्याच जागी दुसरा पुतळा उभारणार असल्यामुळे पाडला, असे सांगितले. मात्र, रातोरात पुतळा पाडल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या बारामतीतच शेतकरी पुतळा उद्ध्वस्त केल्याने नगरपालिकेतील मनमानी कारभाराचा प्रकार पुन्हा पुढे आला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने अडथळा ठरलेला हा पुतळा पाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.सन १९७१ मध्ये लायन्स क्लबने शेतकरी उद्यानाची निर्मिती केली होती. या ठिकाणी नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे. तसेच पाटबंधारे खात्याचीदेखील जागा आहे. पाटबंधाऱ्याच्या जागेवर नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. हे नाट्यगृह बेकायदेशीर बांधले आहे. या प्रकारची जनहित याचिका २००१ मध्ये अ‍ॅड. श्याम पोटरे यांनी दाखल केली आहे. २ वर्षांपूर्वी नगरपालिकेने त्याच परिसरात नटराज नाट्यगृहाच्या लगतच जुनी पाण्याची टाकी होती. ती टाकी पाडून नव्याने उभारण्याचा ठराव करण्यात आला. टाकी पाडण्यात आली. टाकी तेथून स्थलांतरित करण्यात आली. सध्या ही जागादेखील याच मंडळाकडून वापरली जात आहे. याच परिसरात नगरपालिकेच्या उद्यान विभाग, अग्निशमन विभागासह इतर खात्याच्या गाड्या लावण्यात येतात. त्यांना जागा कमी पडत होती. पाण्याची टाकी पाडल्यानंतर या जागेचा वापर करणे नगरपालिकेला शक्य होईल. पण असे असताना टाकी पाडल्यानंतर मोकळी झालेली जागादेखील बळकावण्यात आली आहे. नगरपालिकेच्या गाड्या लावण्यासाठी शाळेच्या खेळाच्या मैदानाचा वापर पालिकेला करावा लागत आहे. १४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून उभारलेला शेतकरी पुतळा न्यायालयाचा आदेश डावलत तोडण्यात आला आहे. या प्रकाराला नगरपालिका प्रशासन, पदाधिकारीदेखील हतबल झाले आहेत. जनहित याचिकेवर सुनावणी अंतिम टप्प्यात असतानाच हा प्रकार झाला आहे. पुतळ्याच्या परिसरातच नाट्यगृह आहे. मागील ४० ते ४२ वर्षांपासून बारामतीकरांचे आकर्षण ठरलेले शेतकरी उद्यान नाट्यगृहामुळे उद्ध्वस्त झाले. उसाची मोळी घेतलेला शेतकरी आता इतिहासजमा झाला आहे. (प्रतिनिधी)