शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बारामतीत १९० वनराई बंधारे पूर्ण

By admin | Updated: November 5, 2014 05:42 IST

बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो.

बारामती : शेतक-यांमध्ये पाणी व्यवस्थापनाबाबत जागृती होण्यासाठी तसेच ओढे, नाले यामधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर हंगामी पिकांसाठी करता यावा यासाठी कृषी विभागामार्फत ‘वनराई’बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येत आहेत. बारामती तालुक्यामध्ये २४० ठिकाणी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी १९० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील सुपे, खामगळवाडी, लोणी भापकर आदी कृषी सज्जांमध्ये कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांनी वनराई बंधाऱ्यांची निमिर्ती केली आहे, अशी माहिती बारामती तालुका कृषी अधिकारी संतोष बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो. बारामती तालुक्यातील जिरायती भागाला कायमच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. त्यामुळे या परिसरात जेवढा पाऊस पडतो. त्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पावसाच्या पाण्याचा शेवटचा थेंब सुध्दा जमिनीत मुरवावा, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होते. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी हंगामी भाजीपाल्यासारखी पिके घेऊ शकतात. या वनराई बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत काहीशा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)