शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

बारामतीत १९० वनराई बंधारे पूर्ण

By admin | Updated: November 5, 2014 05:42 IST

बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो.

बारामती : शेतक-यांमध्ये पाणी व्यवस्थापनाबाबत जागृती होण्यासाठी तसेच ओढे, नाले यामधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर हंगामी पिकांसाठी करता यावा यासाठी कृषी विभागामार्फत ‘वनराई’बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येत आहेत. बारामती तालुक्यामध्ये २४० ठिकाणी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी १९० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील सुपे, खामगळवाडी, लोणी भापकर आदी कृषी सज्जांमध्ये कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांनी वनराई बंधाऱ्यांची निमिर्ती केली आहे, अशी माहिती बारामती तालुका कृषी अधिकारी संतोष बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो. बारामती तालुक्यातील जिरायती भागाला कायमच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. त्यामुळे या परिसरात जेवढा पाऊस पडतो. त्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पावसाच्या पाण्याचा शेवटचा थेंब सुध्दा जमिनीत मुरवावा, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होते. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी हंगामी भाजीपाल्यासारखी पिके घेऊ शकतात. या वनराई बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत काहीशा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)