शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

बारामतीत डेंग्यू, गोचीड तापाचा कहर

By admin | Updated: October 30, 2014 23:24 IST

डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप यांसह अन्य विषाणूजन्य आजारांचे हजारो रुग्ण बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बारामती : डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप यांसह अन्य विषाणूजन्य आजारांचे हजारो रुग्ण बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ऐन दिवाळी सणाच्या काळात रुग्णांची संख्या वाढलेली आहे. नगरपालिका, आरोग्य प्रशासन मात्र स्वस्थ असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील सर्वच भागात या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. बारामती नगरपालिकेचे नगरसेवकदेखील झोपलेले आहेत काय, अशी विचारणा केली जात आहे. 
शहरातील पोलीस निरीक्षकांपासून ते सर्वसामान्य कुटुंबातील बहुतेक घरांमधील एक तरी रुग्ण डेंग्यू, मलेरिया, गोचीड तापाने त्रस्त आहे. विशेषत: डेंग्यू आणि गोचीड तापाने शरीराला सूज येणो, सांधे दुखणो,  पेशी कमी होणो, असे प्रकार आढळून येत आहेत. दोन महिन्यांपासून या प्रकारचे रुग्ण बारामतीत मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. 
रक्त, लघवी तपासणी लॅबमध्ये रक्ताच्या तपासणी करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना अॅडमिट करून घेण्यासाठी जागा कमी पडत आहेत. 
बारामती शहरात सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे सर्वच रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरातील हे रुग्णालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच स्थिती आहे. एमआयडीसीत महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. तेथील परिस्थितीदेखील वेगळी नाही. शहराच्या स्वच्छतेसाठी बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे कंत्रटी पद्धतीने कर्मचारी भरले आहेत. परंतु, हे कर्मचारी काम कोठे करतात, याची माहिती नगरपालिकेच्या 
आरोग्य निरीक्षकांना आणि कंत्रटदारांनाच माहिती आहे. आरोग्य निरीक्षकाचे लक्ष नाही, अशी स्थिती सध्या आहे. 
या संदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने काही नगरसेवक, तसेच आरोग्य निरीक्षकांकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात किंवा फोन बंद केला जातो. असे  प्रकार अनेकदा घडले आहेत. साधारणत: डेंग्यूच्या तीन ते चार वेळा लॅब चाचण्या घेण्यासाठी एकावेळी 1 ते दीड हजार रुपये खर्च येतो. हा खर्च सामान्य नागरिकांना न परवडणारा आहे. (प्रतिनिधी)
 
4नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नगरसेवकदेखील तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेले आहेत. प्रशासनाचे त्यामुळे फावले आहे. नगरपालिकेच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मध्यंतरी खाटिकगल्ली परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा मोठय़ा प्रमाणात होत होता. या भागात दोन ते तीन महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण वाढलेले आहेत. ऐन दिवाळी सणासाठी नागरिकांनी खर्च करण्याऐवजी उपचारासाठी खर्च करावा लागला आहे. या स्थितीत प्रशासनाला कोणीही जाब विचारत नसल्याचे सांगण्यात आले. 
4दोन महिन्यांत आतार्पयत 9 ते 1क् हजार रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. त्यामध्ये साधारणत: 4 ते साडेचार हजार रुग्णांना डेंग्यूसह अन्य विषाणूजन्य आजारांची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
4आरोग्य विभागाने दोन दिवसांपासून घरोघरी जाऊन पुन्हा सव्र्हेक्षण सुरू केले आहे. याद्वारे निश्चित आकडेवारी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. परंतु, मोठय़ा प्रमाणात डेंग्यूचा फैलाव झालेला असतानादेखील ‘नगरपालिका प्रशासन सुस्त’ असल्याचे सांगण्यात येत आहे. 
4या संदर्भात तिवाटणो लॅबचे डॉ. आर. एन. तिवाटणो यांनी सांगितले, की जागृती  वाढल्यामुळे रुग्ण लगेच तपासणी करून घेत आहेत. त्यामुळे डेंग्यूचे निदान लवकर होत आहे. पूर्वी अंगावर ताप काढण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कदाचित रुग्ण दगावत. आता हे प्रमाण पूर्णपणो थांबले आहे. परंतु, डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 
 
साधारणत: दररोज रक्त तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी 2क् ते 25 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान होत आहे. ऐन दिवाळीच्या पाडव्याला या तपासणीसाठी आलेल्यांपैकी 14क् हून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. विशेषत: लवकर निदान होत असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जवळपास संपुष्टात आले आहे. परंतु, डेंग्यूमुळे सातत्याने त्रस होतो. साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास तयार होतात. हे डास दिवसा चावतात. संपूर्ण बारामती शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.  परंतु, नगरपालिका प्रशासनाने, तसेच आरोग्य विभागाकडून सव्र्हेक्षण करणो, धूर फवारणी करणो या उपर दुस:या काही उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच, दर मंगळवारी कोरडा दिवस पाळण्याचे फक्त आवाहन भोंग्यावर करण्यात आले. त्याची जागृती केली जात नाही. 
- डॉ. पंकज गांधी 
 
शहरात साथीचा फै लाव; डॉक्टर्स मात्र 
‘अंदमान’च्या सहलीला..
शहरामध्ये विषाणूजन्य रोगांचा फैलाव असताना जवळपास 4क् ते 45 खासगी डॉक्टर ‘अंदमान’च्या सहलीला गेले आहेत. त्यामध्ये काही डॉक्टरांचा अपवाद आहे. परंतु, साथीचे आजार वाढलेले असताना मुख्य डॉक्टर सहलीला गेल्यामुळे रुग्णालयातील सहायक डॉक्टरांवर रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे.