शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बारामती ‘बोअर’वर!

By admin | Updated: April 5, 2016 00:54 IST

भूगर्भातील पाण्याची पातळी खालवल्याने बारामती शहरात देखील पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

बारामती : भूगर्भातील पाण्याची पातळी खालवल्याने बारामती शहरात देखील पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन पिण्यासाठी सोडल्यामुळे शहरात नगरपालिकेचा पाणीपुरवठा दररोज होत आहे. परंतु, वाढीव हद्दीत अद्याप जलवाहिन्या पोहोचलेल्या नाहीत. त्या ठिकाणी विंधनविहिरींच्या (बोअरवेल) पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु, पाणीपातळी खालवल्याने त्याही बंद पडत आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बारामती शहरासह रुई, जळोची, बारामती ग्रामीण या उपनगरांमध्ये नागरीवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शहराच्या जुन्या हद्दीत पिण्याचे पाणी दररोज नगरपालिकेचे मिळते. परंतु, या उपनगरांमध्ये तांदूळवाडी, जळोचीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, पाणी वापरण्यासाठी घेतलेल्या बोअरवेल्सच्या पाण्याचे स्रोत कमी झाल्यामुळे त्या बंद पडल्या आहेत. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामध्ये हरिकृपानगर, कारभारीनगर, जामदार रोडसह वाढीव हद्दीतील अनेक भागांतील खासगी बोअरवेल्स देखील बंद पडल्या आहेत. पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे.(प्रतिनिधी)मशिन चालकांची चंगळबोअरवेल्सचे पाणी कमी झाल्यामुळे त्याची पुन्हा खोदाई करण्यावर नागरिक भर देत आहेत. साधारणत: अडीचशे ते तीनशे फुटांपर्यंत बोअरवेल्स घेतले जातात. काही ठिकाणी तर पाचशे ते आठशे फुटांपर्यंत खोदाई केली जाते. तरी देखील भूगर्भातीलच पाण्याची पातळी खालावल्याने पाणी लागत नाही. मात्र, बोअरवेल्स खोदाई करणाऱ्या मालकांना पैसे देणे चुकत नाही. ५५ ते ७५ रुपये प्रतिफुटापर्यंत खोदाई आकारणी केली जाते. टँकरने पाणीपुरवठा अनेक भागांत केला जात आहे. त्याचबरोबर पूर्वी जिल्हा परिषदने केलेल्या हातपंपांची दुरुस्ती केली जात आहे. त्याचबरोबर नव्याने काही ठिकाणी बोअरवेल्स खोदण्याचे नियोजन आहे. परंतु, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याने नगरपालिका प्रशासनामार्फत पुढील कारवाई होत आहे. यात मजूरवर्ग सकाळी लवकर घराबाहेर पडत असल्यामुळे ५ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठिकठिकाणी बसवून त्यामध्ये टँकरचे पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.- विक्रांत तांबे, नगरसेवक