शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बारामतीत ढगफुटी; शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: July 2, 2014 01:59 IST

ढगफुटी एरवी धास्ती घेऊन येते. मात्र, बारामतीच्या दुष्काळी भागातील अनेक गावांना सोमवारी झालेल्या ढगफुटीने जीवन दिले.

बारामती/ उंडवडी : ढगफुटी एरवी धास्ती घेऊन येते. मात्र, बारामतीच्या दुष्काळी भागातील अनेक गावांना सोमवारी झालेल्या ढगफुटीने जीवन दिले. पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट अवघ्या दीड तासाच्या पावसाने संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामती-दौंड रस्त्यावरील या गावांना पाण्याचा दुसरा स्त्रोत्र उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजला असल्यासारखे आहे. मागील वर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असताना बारामती तालुक्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे वर्षभर पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाईचा सामना या भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना करावा लागला. पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला तरी पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर केलेल्या खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झाले होेते. दुबार पेरण्यांसाठी पावसाची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ४ ते ६ या दोन तासांत पावसाने होत्याचे नव्हते केले. चार वाजेपर्यंत कोरडे पडलेले तलाव, चाऱ्या, बंधारे, नाले दुथडी भरून वाहू लागले. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता. या भागात कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने ओढ्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यात आले आहे. जलसंंधारणाच्या या कामासाठी लोकसहभाग मिळाला. त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी अडविण्यात यश आले. जलसंधारणाच्या कामामुळे सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी अडविण्यात यश आले. आगामी दोन महिन्यांत या अडविलेल्या पावसाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना वापर करता येणार आहे. बारामती तालुक्यात दुष्काळी पट्ट्यात कऱ्हा नदी खोलीकरणासाठी जवळपास सर्वच ठिकाणी ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली. (वार्ताहर)