शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

बारामतीतील बनवाडी-जराडवाडी गाव तहानलेलेच

By admin | Updated: January 28, 2015 02:22 IST

बारामती पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी २०१५ला जिल्हा नियोजनाखालील कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला होता.

रविकिरण सासवडे, बारामतीबारामती पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी २०१५ला जिल्हा नियोजनाखालील कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. मात्र, प्रत्यक्षात पूर्ण दाखवलेली कामे अपूर्ण असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’च्या पाहणीत उघड झाली आहे. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यातही सुरू करण्यात आलेल्या कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तालुक्यातील बनवाडी, जराडवाडी, काळखैरवाडी, वडगाव निंबाळकर, गुणवडी, मेडद आदी गावांमध्ये या नवीन केलेल्या कामांमधून पाणीपुरवठा सुरू असल्याचे प्रसिद्ध केलेल्या अहवालात दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात येथे पाणीपुरवठा बंद आहे. तर काही ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. केवळ ठेकेदाराने दिलेल्या माहितीवर हा अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप बनवाडी, जराडवाडी येथील ग्रामस्थांनी केला आहे. अहवालात दाखवण्यात आलेल्या योजनेचा लाभ बनवाडी १-२, बनवाडी गावठाण, पेरूचा मळा, पवारवस्ती आदी भागांचा समावेश आहे. ३४ लाख ८८ हजार रुपयांची ही योजना जानेवारी २०१२मध्ये पूर्ण करण्यात यावी, असे सांगितले आहे. मात्र, २०१५ साल उजाडले, तरी हे काम पूर्ण नाही. सध्या येथील ग्रामपंचायतीकडे फक्त तीन ते साडेतीन लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे अपूर्ण असलेले काम कसे पूर्ण होणार, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. बनवाडी-जराडवाडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. येथील ग्रामस्थांना सध्या पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर जनावरांसाठी वाहनांद्वारे दुरून पाणी आणावे लागत आहे. येथील पाणीपुरवठा टाकी, जलवाहिनी, विहिरीवरील पंपाचा वीजजोड आदी कामे अपूर्ण आहेत. विहिरीच्या पाण्याचा उपसा नसल्याने पाणी दूषित झाले आहे. अहवालात येथील काम पूर्ण झाल्याचे आणि पाणीपुरवठाही सुरू असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून पाणीपट्टीही वसूल करण्यात येत आहे. पाणीपुरवठा सुरू नसताना आम्ही पाणीपट्टी का भरायची? असा संतप्त सवालही ग्रामस्थ विचारत आहेत. ठेकेदाराने येथील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. अवघ्या अर्ध्या फुटावर जलवाहिनी गाडण्यात आली आहे. तसेच वीजजोड नसताना वीजजोड दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला महावितरणचे बीलही भरावे लागत आहे. येथील विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र, ठेकेदार आणि पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे बनवाडी जराडवाडी तहानलेलीच आहे. तसेच नियोजित कामामध्ये विहिरीच्या जवळ ७३ हजार रुपयांमध्ये ‘पंपहाऊस’ बांधण्यात येणार आहे. मात्र, ठेकेदाराने जागा नसल्याचे पाणी पुरवठा विभागाला कळवले आहे. त्यांनी पाहणी केली नाही. त्यामुळे संशय व्यक्त होऊ लागला आहे. याबाबत येथील ग्रामस्थ शिवाजी जराड यांनी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती. मात्र, माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. अर्ज करून साठ दिवस उलटले, तरी माहिती मिळाली नाही.