शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

बँका, एटीएमवर दिवसभर तुडुंब गर्दी

By admin | Updated: November 16, 2016 03:05 IST

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातुन रद्द केल्यानंतर सहाव्या दिवशी जिल्ह्यात बँक आणि एटीएम केंद्रावर तुंडुंब गर्दी होती.

बारामती : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातुन रद्द केल्यानंतर सहाव्या दिवशी जिल्ह्यात बँक आणि एटीएम केंद्रावर तुंडुंब गर्दी होती. सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी (दि १५ ) सकाळपासुनच नागरीक आणि ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. बारामतीत तर सायंकाळी ऊशीरापर्यंत रांगा कायम होत्या. तसेच पैसे काढण्यासाठी नागरीकांचा ओघ सुरुच होता.नोटा बदलुन देण्यासाठी आज साडेचार हजार रुपये मर्यादा ठेवण्यात आली होती. तर ग्राहकांना एकावेळी दहा हजारांची रक्कम उपलब्ध करुन देण्यात आली. काही खासगी बँकांनी ग्राहकांना कमाल पाच हजार रुपये मिळणार असल्याचे सुचनाफलक लावले होते. तर एटीएम मधुन एका वेळी अडीच हजारांची रक्कम नागरीकांना मिळत होती. एटीएम मधुन रक्कम काढण्यासाठी काही ग्राहकांनी कमी गर्दी असलेली एटीएम केंद्र शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच एटीएम केंद्रांवर रांगा लावण्यात आल्या होत्या. अडीच हजारांची रक्कम मिळविण्यासाठी किमान दोन तास रांगेत थांबण्याची वेळ ग्राहकांवर आली.बँकांसह पोस्ट कार्यालयातुन देखील नोटा बदलुन देण्यात येत आहेत. एका नागरीकाला अर्ज भरणा केल्यानंतर ४५०० रुपये देण्यात येत आहेत.मंगळवार (दि १५) पर्यंत पोस्ट कार्यालयातुन ५० लाखाहुन अधिक रक्कम ५०० आणि १००० च्या नोटांच्या बदल्यात देण्यात आली आहे, अशी माहिती पोस्टमास्तर सुरेश ताटे यांनी सांनी दिली. दरम्यान, नागरीकांच्या गर्दीमुळे दुपारी एक वाजता नोटा संपल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)