शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

‘बीएएमएस’ इंटर्नशिप तीन महिनेच

By admin | Updated: March 31, 2015 05:23 IST

बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात इंटर्नशिपच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेचे ज्ञान मिळावे यासाठी सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन

पुणे : बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात इंटर्नशिपच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेचे ज्ञान मिळावे यासाठी सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन (सीसीआयएम) संघटनेने ६ महिन्यांचा कालावधी दिला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तो कालावधी ३ महिन्यांनी कमी केला आहे. त्यामुळे राज्यभरातील अडीच हजार विद्यार्थ्यांना ग्रामीण अत्यावश्यक सेवेचे ज्ञानच मिळणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.ग्रामीण भागात जाऊन प्रॅक्टिस करण्यास बहुतांशी एमबीबीएस डॉक्टरांचा विरोध असतो. त्यामुळे ग्रामीण भागात बहुतांशी वैद्यकीय सेवा बीएएमएसचे डॉक्टरच देतात. त्यामुळे राज्य शासनाने बीएएमएस डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची याआधीच परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीएएमएसची पदवी घेतल्यानंतर तेथे प्रॅक्टिस करण्यासाठी जाण्याअगोदर डॉक्टरांना ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची माहिती असावी, त्याचे प्रत्यक्ष ज्ञान असावे, यासाठी सीसीआयएम संघटनेने आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या बीएएमएसच्या विद्यार्थ्यांना शहरातील रुग्णालयांमध्ये ६ महिने आणि ग्रामीणमधील रुग्णालयांमध्ये ६ महिने इंटर्नशिप करण्याचा आदेश २०१२ मध्ये दिला होता. मात्र, आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या नव्या आदेशाकडे दुर्लक्ष करून सीसीआयएमने २०१० मध्ये दिलेल्या इंटर्नशिपसाठी ९ महिने शहर व ३ महिने ग्रामीण असा फॉर्म्युला राबविण्यास सुरुवात केली आहे. या जुन्या फॉर्म्युल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये जाऊन कॅज्युअल्टी, इमर्जन्सी केस हाताळण्याचा अनुभव मिळणार नाही. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होण्याची शक्यता असून, भविष्यात नोकरीच्या संधी त्यांना मिळणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सीसीआयएम संघटनेने २०१२ मध्ये नवा आदेश जारी केल्यानंतर पूर्वीचे आदेश आपोआप रद्द होतात. तरीही विद्यापीठाकडून जुन्याच आदेशाची अंमलबजावणी का होत आहे, असा सवाल विद्यार्थी करत आहेत.