शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

बंदी असूनही बैलगाडा शर्यत

By admin | Updated: April 13, 2016 03:36 IST

बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे रविवारी भिर्र्रर्र झाली. भैरवनाथ यात्रा-उत्सवानिमित्त येथे २५ नामवंत बैलगाडे धावले. विशेष म्हणजे

पुणे : बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे रविवारी भिर्र्रर्र झाली. भैरवनाथ यात्रा-उत्सवानिमित्त येथे २५ नामवंत बैलगाडे धावले. विशेष म्हणजे, लांडेवाडी हे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे गाव आहे. लांडेवाडी यात्रा-उत्सव कमिटीच्या वतीने या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.खासदारांच्याच गावात बैलगाडा शर्यती सुरू असल्याची बातमी सगळीकडे पसरली. शर्यतीबाबत आयोजकांना फोन येऊ लागल्याने शर्यती आटोपत्या घ्याव्या लागल्या. शर्यती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. सकाळी ११ वाजता शर्यतींना सुरुवात झाली. मात्र, १२.३०च्या सुमारास या शर्यती बंद झाल्या. या वेळी सुमारे २५ गाडे धावले. पारनेर, नगर, खेड, शिरूर या ठिकाणांहून बैलगाडे आले होते. मंचर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की शर्यतीबद्दल कळल्यानंतर पोलीस पथक लांडेवाडीत गेले. सुरू असलेल्या शर्यती बंद केल्या. पुन्हा शर्यती सुरू होऊ नयेत म्हणून आम्ही दिवसभर लांडेवाडीतच होतो. बंदी-स्थगिती-बंदीचा खेळ२००६मध्ये औरंगाबाद खंडपीठाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या बंदीला तात्पुरती स्थगिती देत त्या सुरू केल्या. ७ मे २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्राणी क्रूरता कायद्यानुसार पुन्हा शर्यतींवर कायमची बंदी घातली. पदरमोड करून अनेक बैलगाडा मालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. पंजाब, तमिळनाडूमध्ये जाऊन त्यांनी बैलगाडामालकांचे संघटन केले. बैलगाडा मालकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश येऊन ७ जानेवारी २०१६ रोजी वन व पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना जारी केली व पुन्हा शर्यती सुरू झाल्या. मात्र, उच्च न्यायालयाने शर्यतींवर बंदी घातली होती. ही बंदी झुगारून लांडेवाडीत बैलगाडा शर्यती झाल्या. या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यभरातून सुमारे १६० नामवंत गाडे या ठिकाणी आले होते. मला काहीही माहिती नाही : खासदार आढळराव-पाटीलशिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी गावात नव्हतो. बैलगाडा शर्यतीविषयी मला काहीही माहिती नाही,’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.