शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

बालगंधर्व रंगमंदिराला छावणीचे स्वरूप

By admin | Updated: April 25, 2016 01:49 IST

कन्हैया कुमारच्या सभेसाठी पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता.

पुणे : कन्हैया कुमारच्या सभेसाठी पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. दुपारी तीनपासूनच त्याच्या सभेसाठी गर्दी जमायला सुरुवात झाली होती. सभागृह खचाखच भरल्यानंतर कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडणे पोलिसांनी थांबवले. केवळ पासधारकांनाच आतमध्ये सोडण्यात येत होते. सभा ऐकण्यासाठी आतमध्ये सोडावे म्हणून कार्यकर्त्यांनी गेटवरच जोरदार घोषणाबाजी केली. सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही गेटवर चोख बंदोबस्त ठेवलेला होता. स्वत: अतिरीक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे बंदोबस्तावर देखरेख ठेवून होते. यासोबतच परिमंडल एकचे उपायुक्त तुषार दोषी, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तामध्ये तैनात होते. पोलिसांनी रंगमंदिराच्या भोवती दुपारपासूनच अक्षरश: कडे केले होते. नागरिक रेलिंगवरुन चढून आतमध्ये जाऊ नयेत याचीही काळजी घेतली होती. सभेसाठी झालेली मोठी गर्दी आतमध्ये घुसू नये याकरिता दोन्हीही गेट बंद करण्यात आलेली होती. केवळ पासधारकांनाच आतमध्ये सोडण्यात आले होते. सभा सुरु झाल्यानंतर मात्र बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी आतमध्ये सोडा अशा घोषणा दिल्या. महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी कोणालाही नंतर आतमध्ये सोडले नाही. संध्याकाळी कन्हैयाचे बालगंधर्व रंगमंदिरात आगमन झाल्यानंतर गेटजवळील गर्दी हटवत पोलिसांनी सर्वांना रस्त्याच्या दुस-या बाजुला उभे केले. विरोध मावळला : एकही संघटना हजर नाहीविरोध करायला एकही संघटना किंवा पक्षाचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिराजवळ आले नाहीत. सर्व हिंदुत्ववादी संघटना कन्हैयाच्या सभेबाबत सपशेल ‘बॅकफुट’वर गेल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले. सनातन संस्थेने दुपारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणारे पुस्तकाचे वितरण केल्यामुळे त्याच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली. काश्मिरमध्ये फडकवल्या जाणा-या इसिसच्या झेंड्यांबाबत तसेच नक्षलवादी कारवायांबाबत कन्हैया काहीही बोलायला तयार नसून त्याची कृती देशविरोधी असल्याचा आरोपही वर्तक यांनी केला.रामदेवबाबांवर टीका करताना कन्हैयाकुमार म्हणाला, ‘‘एक बाबाजी दररोज सकाळी आत घ्या, बाहेर सोडा, असे म्हणत असतो. मात्र, भुखेकंगाल लोकांनी काय आत घ्यायचे आणि काय सोडायचे. त्यांची सगळी उत्पादनेही इतकी महाग आहेत की गरीब माणूस ते घेऊच शकणार नाही.