शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

बालगंधर्व रंगमंदिराला छावणीचे स्वरूप

By admin | Updated: April 25, 2016 01:49 IST

कन्हैया कुमारच्या सभेसाठी पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता.

पुणे : कन्हैया कुमारच्या सभेसाठी पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. दुपारी तीनपासूनच त्याच्या सभेसाठी गर्दी जमायला सुरुवात झाली होती. सभागृह खचाखच भरल्यानंतर कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडणे पोलिसांनी थांबवले. केवळ पासधारकांनाच आतमध्ये सोडण्यात येत होते. सभा ऐकण्यासाठी आतमध्ये सोडावे म्हणून कार्यकर्त्यांनी गेटवरच जोरदार घोषणाबाजी केली. सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही गेटवर चोख बंदोबस्त ठेवलेला होता. स्वत: अतिरीक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे बंदोबस्तावर देखरेख ठेवून होते. यासोबतच परिमंडल एकचे उपायुक्त तुषार दोषी, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तामध्ये तैनात होते. पोलिसांनी रंगमंदिराच्या भोवती दुपारपासूनच अक्षरश: कडे केले होते. नागरिक रेलिंगवरुन चढून आतमध्ये जाऊ नयेत याचीही काळजी घेतली होती. सभेसाठी झालेली मोठी गर्दी आतमध्ये घुसू नये याकरिता दोन्हीही गेट बंद करण्यात आलेली होती. केवळ पासधारकांनाच आतमध्ये सोडण्यात आले होते. सभा सुरु झाल्यानंतर मात्र बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी आतमध्ये सोडा अशा घोषणा दिल्या. महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी कोणालाही नंतर आतमध्ये सोडले नाही. संध्याकाळी कन्हैयाचे बालगंधर्व रंगमंदिरात आगमन झाल्यानंतर गेटजवळील गर्दी हटवत पोलिसांनी सर्वांना रस्त्याच्या दुस-या बाजुला उभे केले. विरोध मावळला : एकही संघटना हजर नाहीविरोध करायला एकही संघटना किंवा पक्षाचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिराजवळ आले नाहीत. सर्व हिंदुत्ववादी संघटना कन्हैयाच्या सभेबाबत सपशेल ‘बॅकफुट’वर गेल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले. सनातन संस्थेने दुपारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणारे पुस्तकाचे वितरण केल्यामुळे त्याच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली. काश्मिरमध्ये फडकवल्या जाणा-या इसिसच्या झेंड्यांबाबत तसेच नक्षलवादी कारवायांबाबत कन्हैया काहीही बोलायला तयार नसून त्याची कृती देशविरोधी असल्याचा आरोपही वर्तक यांनी केला.रामदेवबाबांवर टीका करताना कन्हैयाकुमार म्हणाला, ‘‘एक बाबाजी दररोज सकाळी आत घ्या, बाहेर सोडा, असे म्हणत असतो. मात्र, भुखेकंगाल लोकांनी काय आत घ्यायचे आणि काय सोडायचे. त्यांची सगळी उत्पादनेही इतकी महाग आहेत की गरीब माणूस ते घेऊच शकणार नाही.