शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

बालगंधर्व रंगमंदिराला छावणीचे स्वरूप

By admin | Updated: April 25, 2016 01:49 IST

कन्हैया कुमारच्या सभेसाठी पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता.

पुणे : कन्हैया कुमारच्या सभेसाठी पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. दुपारी तीनपासूनच त्याच्या सभेसाठी गर्दी जमायला सुरुवात झाली होती. सभागृह खचाखच भरल्यानंतर कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडणे पोलिसांनी थांबवले. केवळ पासधारकांनाच आतमध्ये सोडण्यात येत होते. सभा ऐकण्यासाठी आतमध्ये सोडावे म्हणून कार्यकर्त्यांनी गेटवरच जोरदार घोषणाबाजी केली. सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही गेटवर चोख बंदोबस्त ठेवलेला होता. स्वत: अतिरीक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे बंदोबस्तावर देखरेख ठेवून होते. यासोबतच परिमंडल एकचे उपायुक्त तुषार दोषी, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तामध्ये तैनात होते. पोलिसांनी रंगमंदिराच्या भोवती दुपारपासूनच अक्षरश: कडे केले होते. नागरिक रेलिंगवरुन चढून आतमध्ये जाऊ नयेत याचीही काळजी घेतली होती. सभेसाठी झालेली मोठी गर्दी आतमध्ये घुसू नये याकरिता दोन्हीही गेट बंद करण्यात आलेली होती. केवळ पासधारकांनाच आतमध्ये सोडण्यात आले होते. सभा सुरु झाल्यानंतर मात्र बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी आतमध्ये सोडा अशा घोषणा दिल्या. महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी कोणालाही नंतर आतमध्ये सोडले नाही. संध्याकाळी कन्हैयाचे बालगंधर्व रंगमंदिरात आगमन झाल्यानंतर गेटजवळील गर्दी हटवत पोलिसांनी सर्वांना रस्त्याच्या दुस-या बाजुला उभे केले. विरोध मावळला : एकही संघटना हजर नाहीविरोध करायला एकही संघटना किंवा पक्षाचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिराजवळ आले नाहीत. सर्व हिंदुत्ववादी संघटना कन्हैयाच्या सभेबाबत सपशेल ‘बॅकफुट’वर गेल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले. सनातन संस्थेने दुपारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणारे पुस्तकाचे वितरण केल्यामुळे त्याच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली. काश्मिरमध्ये फडकवल्या जाणा-या इसिसच्या झेंड्यांबाबत तसेच नक्षलवादी कारवायांबाबत कन्हैया काहीही बोलायला तयार नसून त्याची कृती देशविरोधी असल्याचा आरोपही वर्तक यांनी केला.रामदेवबाबांवर टीका करताना कन्हैयाकुमार म्हणाला, ‘‘एक बाबाजी दररोज सकाळी आत घ्या, बाहेर सोडा, असे म्हणत असतो. मात्र, भुखेकंगाल लोकांनी काय आत घ्यायचे आणि काय सोडायचे. त्यांची सगळी उत्पादनेही इतकी महाग आहेत की गरीब माणूस ते घेऊच शकणार नाही.