शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात लढणार बालसेना

By admin | Updated: November 9, 2015 02:22 IST

शाळेत कधी अभ्यास न केल्याने तर कधी शिक्षकांचे न ऐकल्याने मिळणारा छडीचा मार... हात आणि पाठीवर वळ उठेपर्यंत विद्यार्थ्यांना केलेली मारहाण...

पुणे : शाळेत कधी अभ्यास न केल्याने तर कधी शिक्षकांचे न ऐकल्याने मिळणारा छडीचा मार... हात आणि पाठीवर वळ उठेपर्यंत विद्यार्थ्यांना केलेली मारहाण... काही वेळेस शिक्षकांच्या वाईट नजरेला बळी पडणारे विद्यार्थी तर कधी आपल्याच वर्गमित्रांकडून होणारा त्रास... अशा एक ना अनेक गोष्टी रोखण्यासाठी, अन्याय व छेडछाडीविरोधात आता बालसेनाच लढण्यास सज्ज झाली.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. कधी त्या समस्या शारीरिक असतात, तर कधी मानसिक. मुले आपल्या समस्या कोणाला सांगायच्या आणि कशा सांगायच्या, या अडचणीत असतात. काही गोष्टी उघडपणे सांगायला त्यांना भीती वाटते, मग अशा वेळेस मनामध्ये काही गोष्टी ठेवून ती एकलकोंडी होतात व शाळेचा तिटकारा करू लागतात. अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्याच माध्यमातून सोडविण्यासाठी ज्ञानदेवी चाइल्डलाइनने पुढाकार घेतला असून २५० शाळांमध्ये बालसेनेची स्थापना केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना हक्काचा एक मित्रच उपलब्ध झाला आहे. बालसेनेअंतर्गत प्रत्येक शाळेत ७ वी, ८ वी व ९ वीच्या वर्गातील दोन विद्यार्थी लीडर म्हणून निवडले जातात. विद्यार्थी आपल्या समस्या या लीडरपुढे मांडतात. त्या समस्यांवर योग्य तोडगा काढून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी लीडरची असते. काही वेळेस प्रश्न इतके गंभीर असतात, की लीडर ते सोडवू शकत नाही. मग अशा वेळेस चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. महिन्यातून एकदा ते प्रत्येक शाळेला भेट देतात व विद्यार्थ्यांच्या कठीण समस्यांचे निराकरण करतात. काही वेळेस प्रकरण हाताबाहेर गेले तर पोलीस तक्रारही केली जाते. मदतीसाठी वर्षभराच्या बालकापासून ते १८ वर्षांच्या मुलांपर्यंत अनेक गंभीर स्वरुपाच्या तक्रारींचे फोन या हेल्पलाइनवर येतात. शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये ४० ते ५० टक्के तक्रार नोंदविण्याचे प्रमाण असल्याचे या चाइल्डलाइनच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्ञानदेवी चाइल्डलाइनने पुण्यातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधला. त्यांचे प्रश्न, अडचणी यावर त्यांना मार्गदर्शन तर केलेच जाते; पण काही केसेसमध्ये विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशनही केले जाते. शिक्षक आणि मुख्याध्यापकांना समज दिली जाते. मुलांवर हात न उचलता त्यांना समजावून सांगून प्रश्न सोडवा, असे या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. विद्यार्थ्यांना मारहाण, शिवीगाळ करणे, त्यांच्याशी नको त्या भाषेत बोलणे या गोष्टींवर कायद्यानेच बंदी आहे. काही वेळेस वैयक्तिक फ्रस्ट्रेशन विद्यार्थ्यांवर काढले जाते. त्यांना अन्यायकारक शिक्षा दिली जाते. मुले मारल्याने कोडगी होतात, त्यामुळे त्यांना प्रेमाने समजावले पाहिजे. बालसेनेच्या माध्यमातून आम्ही मुलांनाचा लीडर करतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सोडविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर देतो. - अनुराधा सहस्रबुद्धे संचालिका, ज्ञानदेवी चाइल्डलाइन)एका विद्यार्थ्याला शाळेतीलच काही मुलांकडून त्रास दिला जायचा. त्याची टिंगल करणे, त्याच्यावर हसणे, एकटे पाडणे अशा प्रकारांमुळे तो मुलगा खचून गेला होता. त्याला चाइल्ड हेल्पलाइनबाबत शाळेतूनच माहिती मिळाल्यानंतर त्याने फोन केला आणि आम्ही त्याचा प्रॉब्लेम सोडवला. - सुचेता लोंढे (को-आॅर्डिनेटर, ज्ञानदेवी चाइल्डलाइन)