शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पणदरे खिंडीतील वळणे धोकादायक

By admin | Updated: November 26, 2015 00:59 IST

तीव्र उतार व नागमोडी वळणे देतात अपघाताला निमंत्रण. संरक्षक कठड्यांच्या अभावामुळे माळेगाव, पणदरे गावाच्या पश्चिमेला असलेल्या खिंडीचा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे.

माळेगाव : तीव्र उतार व नागमोडी वळणे देतात अपघाताला निमंत्रण. संरक्षक कठड्यांच्या अभावामुळे माळेगाव, पणदरे गावाच्या पश्चिमेला असलेल्या खिंडीचा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे. छोटे-मोठे अपघात तर आता नित्याचीच बाब बनत चालले आहेत. नीरा-बारामती या वर्दळीच्या मार्गावर असलेली खिंड दिसायला छोटी व सहज सोपी वाटत असली, तरी खिंडीच्या दोन्ही बाजूंना असलेला तीव्र उतार व नागमोडी वळणे यांमुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते. या खिंडीला केवळ तीनच वळणे असूनही अपघाताचे प्रमाण अधिक आहे. आजवर झालेल्या अपघातांमध्ये कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या खिंडीला तीव्र चढ व उतार असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने नीरेकडून येणारी वाहने थेट ४० ते ५० फूट खोल खड्ड्यात जाऊन पडतात. तर, बारामतीकडून येणारी वाहने सरळ डोंगरावर जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवित हानी होते. अशी परिस्थिती असतानादेखील दोन्ही वळणांवर कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे उभारण्यात आलेले नाहीत. रस्त्याची खड्डे पडून चांगलीच दुरवस्था झाली आहे. (वार्ताहर)ऊस वाहतूकदारांची तारेवरची कसरत...४माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर साखर कारखान्याला याच खिंडीतून उसाची वाहतूक केली जाते. उसाचे ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाड्या चालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. ओव्हरलोड केल्याने व एकाच वेळी दोन-दोन ट्रेलर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असे अपघात होतात. खिंडीला केवळ तीनच वळणे असूनही अपघाताचे प्रमाण अधिक आहे. आजवर झालेल्या अपघातांमध्ये कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.वाहनचालक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण देत आहेत. केवळ खड्डे बुजविण्याव्यतिरिक्त कोणतेच काम होताना दिसत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आसल्याचे दृश्य आहे. या भागात वळणांवर संरक्षक कठडे उभारण्याबरोबरच पांढरे पट्टे व रेडियमच्या चमकणाऱ्या पट्ट्या लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.