शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

गडकिल्ले प्लॅस्टिक, कचरामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:51 IST

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ५ जून महाराष्ट्रात ‘फोर्ट डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ज्या शिवभक्तांना राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर उपस्थित राहता येणार नाही

भोसरी : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ५ जून महाराष्ट्रात ‘फोर्ट डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ज्या शिवभक्तांना राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर उपस्थित राहता येणार नाही त्यांनी आपल्या जवळच्या किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता करावी आणि महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले प्लॅस्टिक व कचरामुक्त करावेत, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले असल्याची माहिती शिवराज्याभिषेक समितीचे पिंपरी-चिंचवड समन्वयक विश्वास काशिद यांनी दिली़किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी हा दिवस ‘फोर्ट डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ५ व ६ जून रोजी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ जून रोजी सकाळी सात वाजता चित्त दरवाजापासून रायगड स्वच्छता मोहिमेस सुरुवात होईल. होळीचा माळ येथे दुपाारी बारा वाजता मोहिमेचा समारोप होईल़ दुपारी साडेबारा वाजता अन्नछत्राचे उद्घाटन होईल.दुपारी साडेतीन वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत होईल. येथून ते शिवभक्तांसमवेत पायी गड चालण्यास सुरुवात करतील. साडेचार वाजता गडपूजन, सहा वाजता रायगडावरील उत्खननात मिळालेल्या साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. साडेसहा वाजता, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, सात वाजता शाहिरी कार्यक्रम, रात्री आठ वाजता संभाजीराजे यांचा थेट शिवभक्तांशी संवाद होईल. साडेआठ वाजता, गडदेवता शिरकाईचा गोंधळ, रात्री नऊ वाजता कीर्तन, जागर व रात्री शाहिरांचा कार्यक्रम होणार आहे.दुसऱ्या दिवशी दि. ६ जून रोजी सकाळी सहा वाजता ध्वजपूजन, शाहिरी कार्यक्रम, साडेनऊ वाजता शिवाजीमहाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. पावणे दहाच्या सुमारास युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत व मिरवणुकीने राजसदरेकडे रवाना करण्यात येईल. दहा वाजून दहा मिनिटांनी संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या अभिषेकाला सुरुवात होईल. मेघडंबरीतील शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात येईल. अकरा वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. दुपारी बारा वाजता शिवरायांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सांगता होईल.