शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात कधी ना कधी तरी 'बॅडपॅच' येतोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST

हे कधी करियरच्या बाबतीत होतं तर कधी नात्यांच्या. तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आंत मात्र उलथापालथ ...

हे कधी करियरच्या बाबतीत होतं तर कधी नात्यांच्या.

तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आंत मात्र उलथापालथ सुरू असते.

कधी व्यवहारांची गणितं चुकतात तर कधी अंदाज फसतात.

कधी आपला काहीही दोष नसताना अपयशाचे फास आवळले जातात.

आणि बऱ्याचदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

मग चहुबाजूनी जी कोंडी होते त्यालाच आपण म्हणतो बॅडपॅच !

असा बॅडपॅच आला की तो आपल्या आयुष्यात किती काळ राहील हे सांगता येत नाही मात्र एकदा आला की आयुष्य नकोसं करुन सोडतो...कधी कधी जगण्याला फूल स्टॉप द्यावा, असंही वाटून जातं.

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं, तरी हा असा बॅड पॅच कधीतरी येतोच. आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

पण बॅडपॅच जगण्याचा भाग असेल तर नाकारून कसं चालेल. यायचा तर येउद्या.

आपण दोन गोष्टींची मानसिक तयारी ठेवली तर त्यातील त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. एक म्हणजे आपला दृष्टिकोन आणि स्वीकारण्याची मानसिकता.

आहे ही परिस्थिती जशीच्या तशी मनापासून स्वीकारली की निदान त्या परिस्थितीविषयीच्या तक्रारी कमी होऊन जातात. आणि मगच त्यावर मात करण्याच्या काही आशा निर्माण होऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन! आपण पाहतो कसं हे फार महत्त्वाचं. दृष्टिकोन जितका सकारात्मक ठेवू तेवढं लढण्याचं, जगण्याचं बळ मिळतं.

बॅडपॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं राहतं हे फक्त आणि फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगात आपण कसे वागतो,

काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो....

हे आपलं आपल्याला समजू शकतं...

आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. हा वाईट काळ खूप काही काही शिकवून जातो.

यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो.

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात असतं... ते मात्र आत्मसात करायला हवं.

आपला बॅडपॅच आहे हेच नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि आंधळेपणाने स्वतःचं नुकसान करत रहायचं का, तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव शिकवत राहतात बरंच काही. सगळं संपलंय असं कधीच नसतं आयुष्यात. कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे आयुष्य बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

तेव्हा बॅडपॅच आले तर येउद्या..

ते भल्याभल्याना चुकलेले नाहीत. मग तो सचिन असो वा अमिताभ !

त्या काळात वागायचं कसं, दृष्टिकोन कसा ठेवायचा आणि स्वतःला आणखी तावून सुलाखून बाहेर कसं काढायचं हे त्यांनी पाहिलं. आपल्याही हातात तेवढंच असतं.

प्रतिकूलतेत संधी अधिक असतात हे लक्षात ठेवून प्रयत्न करणं सोडायचं नाही. आज ना उद्या या दिवसांतून बाहेर येऊच आणि फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेऊ हे मनात ठेवायचं.. या काळात संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, अडवले, थांबवले, असे काहीही झाले तरी आपली वाट सोडायची नाही. तीच उद्या अनेक जण अनुसरणार असतात.

*तेव्हा बॅडपॅच आला तर येऊ द्या..*

*त्यालाही सांगा मी तुझ्याही स्वागतासाठी सज्ज आहे... !*

(मनाने खचलेल्या ज्ञात अज्ञात मित्रांसाठी...)