शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बोगस बिल्डरमुळे निकृष्ट बांधकामे

By admin | Updated: November 3, 2014 05:05 IST

बांधकाम क्षेत्राचा गंध नसलेले अनेक जण पिंपरी- चिंचवडमध्ये बिल्डर झाले असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची बांधकामे मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहेत.

संजय माने, मंगेश पांडे, पिंपरीबांधकाम क्षेत्राचा गंध नसलेले अनेक जण पिंपरी- चिंचवडमध्ये बिल्डर झाले असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची बांधकामे मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहेत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे काही प्रमाणात त्यास आळा बसला असला, तरी अशी बांधकामे सर्रास सुरू असून, नऱ्हे आंबेगावातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत १५ लाख चौरस फुटांची अवैध बांधकामे महापालिकेच्या कारवाईत जमीनदोस्त झाली आहेत. त्यामध्ये अनेक बांधकामे ही नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी केलेली नव्हती. जमिनीचे मालक आणि बांधकाम क्षेत्राचे जुजबी ज्ञान असलेल्यांनी भागिदारीत (जॉर्इंट व्हेंचर) तत्त्वावर या बांधकाम क्षेत्रात शिरकाव केला आहे. महापालिकेचा परवाना मिळविणे तर दूरच, बांधकामासाठी आवश्यक साहित्य, त्याचा दर्जा याबद्दलचा गंध नसलेल्यांनीही इमारती उभारल्या आहेत. त्यांनी केलेल्या बांधकामाच्या महापालिकेकडे नोंदीच नसतील, तर त्यांच्या कामाच्या दर्जाच्या तपासणीचे काय, असा प्रश्न आता रहिवासी उपस्थित करू लागले आहेत. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहराचे नागरीकरण वाढत आहे. उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने अनेक जण शहरात वास्तव्यास येत आहे. यामुळे घरांचीही मागणीही वाढत आहे. तसेच जागेलाही सोन्यापेक्षा अधिक भाव आला आहे. जागा घेऊन बांधकाम व्यावसायिक मोठमोठे प्रकल्प उभे करीत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सूट आणि सवलतही दिल्या जात आहेत. यामुळे बांधकामांच्या दर्जाचा विचार न करता, योजनांच्या आमिषाला आकर्षित होऊन कमी दरात सदनिकास मिळते म्हणून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसते. अशा वेळी घर खरेदी करताना ग्राहकांनीही खात्री करून घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडेच दुर्लक्ष होत असल्याने इमारत कोसळून होणाऱ्या दुर्घटनेत अनेकांचे बळी जात आहेत.न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेची अवैध बांधकामाविरुद्धची कारवाई दोन वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत १५ लाख ४४ हजार ६९७ चौरस फुटांची ६८४ अनधिकृत बांधकामे भुईसपाट झाली आहेत, तर ३१ मार्चनंतर अनधिकृत बांधकामे होता कामा नयेत, अशी भूमिका घेऊन महापालिकेने या कालावधीत सुरू असलेल्या बांधकामांचे पंचनामे केले. २२०७ बांधकामधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. ही बांधकामे न्यायालयाचा पुढील निर्णय होईपर्यंत ‘जैसे थे’ ठेवावीत, अशा सूचना महापालिकेने दिल्या. तरीही त्या काळात राहिलेली अर्धवट बांधकामे पूर्ण करण्याचे प्रयत्न होत आहेत. घाईघाईत अशी बांधकामे रात्रीचा दिवस करून पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कोणत्याही ठेकेदाराला काम दिले जात आहे. हेच अत्यंत धोकादायक ठरू शकते. अर्धवट स्थितीतील ५९ लाख १४ हजार ३१६ चौरस फुटांची बांधकामे अशाच पद्धतीने उरकण्याचे काम शहरात ठिकठिकाणी सुरू असून, त्याकडे महापालिका प्रशासन आणि सक्षम यंत्रणेचा काणाडोळा झाला आहे.