शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

बोगस बिल्डरमुळे निकृष्ट बांधकामे

By admin | Updated: November 3, 2014 05:05 IST

बांधकाम क्षेत्राचा गंध नसलेले अनेक जण पिंपरी- चिंचवडमध्ये बिल्डर झाले असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची बांधकामे मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहेत.

संजय माने, मंगेश पांडे, पिंपरीबांधकाम क्षेत्राचा गंध नसलेले अनेक जण पिंपरी- चिंचवडमध्ये बिल्डर झाले असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची बांधकामे मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहेत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे काही प्रमाणात त्यास आळा बसला असला, तरी अशी बांधकामे सर्रास सुरू असून, नऱ्हे आंबेगावातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत १५ लाख चौरस फुटांची अवैध बांधकामे महापालिकेच्या कारवाईत जमीनदोस्त झाली आहेत. त्यामध्ये अनेक बांधकामे ही नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी केलेली नव्हती. जमिनीचे मालक आणि बांधकाम क्षेत्राचे जुजबी ज्ञान असलेल्यांनी भागिदारीत (जॉर्इंट व्हेंचर) तत्त्वावर या बांधकाम क्षेत्रात शिरकाव केला आहे. महापालिकेचा परवाना मिळविणे तर दूरच, बांधकामासाठी आवश्यक साहित्य, त्याचा दर्जा याबद्दलचा गंध नसलेल्यांनीही इमारती उभारल्या आहेत. त्यांनी केलेल्या बांधकामाच्या महापालिकेकडे नोंदीच नसतील, तर त्यांच्या कामाच्या दर्जाच्या तपासणीचे काय, असा प्रश्न आता रहिवासी उपस्थित करू लागले आहेत. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहराचे नागरीकरण वाढत आहे. उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने अनेक जण शहरात वास्तव्यास येत आहे. यामुळे घरांचीही मागणीही वाढत आहे. तसेच जागेलाही सोन्यापेक्षा अधिक भाव आला आहे. जागा घेऊन बांधकाम व्यावसायिक मोठमोठे प्रकल्प उभे करीत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सूट आणि सवलतही दिल्या जात आहेत. यामुळे बांधकामांच्या दर्जाचा विचार न करता, योजनांच्या आमिषाला आकर्षित होऊन कमी दरात सदनिकास मिळते म्हणून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसते. अशा वेळी घर खरेदी करताना ग्राहकांनीही खात्री करून घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडेच दुर्लक्ष होत असल्याने इमारत कोसळून होणाऱ्या दुर्घटनेत अनेकांचे बळी जात आहेत.न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेची अवैध बांधकामाविरुद्धची कारवाई दोन वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत १५ लाख ४४ हजार ६९७ चौरस फुटांची ६८४ अनधिकृत बांधकामे भुईसपाट झाली आहेत, तर ३१ मार्चनंतर अनधिकृत बांधकामे होता कामा नयेत, अशी भूमिका घेऊन महापालिकेने या कालावधीत सुरू असलेल्या बांधकामांचे पंचनामे केले. २२०७ बांधकामधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. ही बांधकामे न्यायालयाचा पुढील निर्णय होईपर्यंत ‘जैसे थे’ ठेवावीत, अशा सूचना महापालिकेने दिल्या. तरीही त्या काळात राहिलेली अर्धवट बांधकामे पूर्ण करण्याचे प्रयत्न होत आहेत. घाईघाईत अशी बांधकामे रात्रीचा दिवस करून पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कोणत्याही ठेकेदाराला काम दिले जात आहे. हेच अत्यंत धोकादायक ठरू शकते. अर्धवट स्थितीतील ५९ लाख १४ हजार ३१६ चौरस फुटांची बांधकामे अशाच पद्धतीने उरकण्याचे काम शहरात ठिकठिकाणी सुरू असून, त्याकडे महापालिका प्रशासन आणि सक्षम यंत्रणेचा काणाडोळा झाला आहे.