शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

गट अ व ब पदांवर मागल्या दाराने भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:09 IST

पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्त (अन्न) गट-अ व ब, अन्न सुरक्षा अधिकारी गट-अ ...

पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्त (अन्न) गट-अ व ब, अन्न सुरक्षा अधिकारी गट-अ ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) भरण्यात येतात. परंतु रिक्त पदे ही एमपीएससीद्वारे भरण्याऐवजी जाणीवपूर्वक रिक्त ठेवलेली आहेत. ही पदे पदोन्नतीने भरून घेण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरु आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या विभागातील ज्या उमेदवारांची नियम बाह्यनिवड करण्यात आली आहे. ती निवड रद्द करून एमपीएस्सीककडून भरावीत यावीत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

शासनस्तरावरील विभागातील गट अ व ब ची पदे भरण्याचे वैधानिक संस्था म्हणून एमपीएससीला अधिकार आहेत. मात्र असे न करता अनेक विभागातील पदे रिक्त असताना देखील याची माहिती सामान्य प्रशासन विभागाला न देता पदोन्नतीच्या नावाखाली भरण्याचा प्रकार सुरु आहे. त्यासाठी राज्यात वरिष्ठ स्तरावर एक दबाव गट कार्यरत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

अन्नसुरक्षा अधिकारी गट-अ हे पद शंभर टक्के एमपीएससीद्वारे भरले जातात. अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब यांची जवळपास १०० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. तसेच सहायक आयुक्त (अन्न) गट अ या पदाची ४० पदे रिक्त आहेत, असे विद्यार्थी सांगतात.

अन्न व औषध प्रशासनाने आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने सामान्य प्रशासनाच्या मदतीने १५ सप्टेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार सहाय्यक आयुक्त (अन्न) गट-अ या पदासाठी तयार केलेल्या सर्विसेस रूल्सनुसार सदर मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे सरळसेवा भरतीने आणि ५० टक्के पदे सेवाज्येष्ठता सूचीनुसार भरणे बंधनकारक (अनिवार्य) आहे. परंतु नवीन उमेदवारांना कोणतीही संधी न देता विभागातीलच वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मागच्या दरवाजाने तदर्थ पदोन्नतीने नियमबाह्य पद्धतीने देऊन एमपीएससीच्या जागांवर वर्णी लावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. नियमबाह्य पदे न भरता एमपीएससीकडून भरावीत, तरच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.