शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

रामचंद्र धादवड, सीमा काकडे यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:13 IST

घोडेगाव येथे शंकरराव विठू केंगले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी किसान सभा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने ...

घोडेगाव येथे शंकरराव विठू केंगले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी किसान सभा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने यावर्षीपासून प्रथमच या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, अशोकराव काळे, विलास केंगले, सुभाष भोकटे, शिवराम केंगले, अमोल अंकुश, बाळासाहेब कानडे, बुधाजी डामसे, गौतम खरात, रामकृष्ण बोऱ्हाडे, डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर, डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, कृष्णा वडेकर आदी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावर्षीचा पुरस्कार निर्सगवासी रामचंद्र धादवड यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आदिवासी प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून काम केले, तर सीमाताई काकडे रोजगार हमी कायदयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यभर फिरून लोकांमध्ये जाणीजागृतीचे काम करत आहेत. रामचंद्र धादवड हयात नसल्याने त्यांचा पुरस्कार त्यांचा मुलगा विष्णू धादवड यांनी, तर सीमाताई काकडे आजारी असल्याने त्यांचा पुरस्कार नंदा मोरमारे यांनी स्वीकारला.

शंकरराव विठू केंगले यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जात आहे.ते सन १९६१ ते १९७८ दरम्यान ठाणे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी आदिवासी समुदायाचे प्रश्न आणि प्रशासनाची दुर्लक्षाची भावना पाहून आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते घोडेगाव येथे कायमचे रहिवासी झाले. सन १९७८ ते १९९५ या काळात त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कामात स्वतःला झोकून दिले होते. यामध्ये त्यांनी हिरड्याच्या भाववाढीसाठी आंदोलने केली. पुणे येथून घोडेगाव येथे प्रकल्प कार्यालय आणण्यासाठी प्रयत्न केले. “आधी पुनर्वसन मग धरण ” अशी भूमिका घेऊन लढा उभा केला. भीमाशंकर अभयारण्य विरोधातील लढा असे अनेक लढे व समाजासाठी त्यांनी काम केले. या दरम्यान त्यांनी पंचायत समिती आंबेगाव येथील सभापती पद भूषवलेले आहे. यांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी व त्यांचा विचार आणि कार्य हे चिरंतन राहून वर्तमानात सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करणे या भूमिकेतून हा स्मृती पुरस्कार किसान सभेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

फोटो :