शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

मतदानाविषयी वाढतेय तरुणाईत जागृती

By admin | Updated: January 25, 2016 01:03 IST

मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल.

पुणे : मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल. हा विचार प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचविला जातो तसेच अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून व सोशल मीडियाद्वारे देखील मतदानाविषयी जागृती केली जाते. याचा परिणाम व तरुणांचा उत्साह पाहता गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आज १८ ते ३० वयोगटातील मतदान १० टक्क्यांनी वाढलेले दिसते, अशी माहिती उपनिवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी दिली.मतदानाविषयी जनजागृतीसाठी व तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडळाच्या बैठकीत २५ जानेवारी हा दिवस मतदान दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. तसेच मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान करणे ही लोकशाहीची ताकद असते. अशा विविध विषयांवर अनेक महाविद्यालयांत मतदान हक्काविषयी व्याख्याने आयोजित करण्यात येतात. तसेच या माध्यमातून तरुण मतदारांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना मतदान करण्याचे महत्त्व कळावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.काही सुशिक्षित वर्गामध्ये एका मताने काय फरक पडणार, हा विचार मनात बाळगून मतदानचा दिवस हा सरकारी सुट्टी म्हणून साजरा करतात. तर काही जण बाहेरगावी सहलीचा बेत आयोजित करतात. मग हाच वर्ग, मतदान न करता चुकीचे सरकार निवडून आले आहे, भ्रष्टाचार वाढत आहे असे अनेक प्रश्न या नागरिकांना पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी जर प्रत्येकाने मतदाराने योग्य हक्क बजावून आणि योग्य उमेदवाराला निवडून दिले तर अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. जनतेच्या मतदानावर योग्य शासन ठरते. शेवटी जनताच सर्वश्रेष्ठ असते. कायद्याने १८ वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे.