शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

मतदानाविषयी वाढतेय तरुणाईत जागृती

By admin | Updated: January 25, 2016 01:03 IST

मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल.

पुणे : मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल. हा विचार प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचविला जातो तसेच अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून व सोशल मीडियाद्वारे देखील मतदानाविषयी जागृती केली जाते. याचा परिणाम व तरुणांचा उत्साह पाहता गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आज १८ ते ३० वयोगटातील मतदान १० टक्क्यांनी वाढलेले दिसते, अशी माहिती उपनिवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी दिली.मतदानाविषयी जनजागृतीसाठी व तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडळाच्या बैठकीत २५ जानेवारी हा दिवस मतदान दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. तसेच मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान करणे ही लोकशाहीची ताकद असते. अशा विविध विषयांवर अनेक महाविद्यालयांत मतदान हक्काविषयी व्याख्याने आयोजित करण्यात येतात. तसेच या माध्यमातून तरुण मतदारांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना मतदान करण्याचे महत्त्व कळावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.काही सुशिक्षित वर्गामध्ये एका मताने काय फरक पडणार, हा विचार मनात बाळगून मतदानचा दिवस हा सरकारी सुट्टी म्हणून साजरा करतात. तर काही जण बाहेरगावी सहलीचा बेत आयोजित करतात. मग हाच वर्ग, मतदान न करता चुकीचे सरकार निवडून आले आहे, भ्रष्टाचार वाढत आहे असे अनेक प्रश्न या नागरिकांना पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी जर प्रत्येकाने मतदाराने योग्य हक्क बजावून आणि योग्य उमेदवाराला निवडून दिले तर अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. जनतेच्या मतदानावर योग्य शासन ठरते. शेवटी जनताच सर्वश्रेष्ठ असते. कायद्याने १८ वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे.