शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कानगावला शेतक-यांचा जागरण गोंधळ, राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा आठवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:01 IST

राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाअंतर्गत शेतक-यांनी खंडेरायाला जागरण गोंधळ घातला. निद्रीस्त शासनाला जाग यावी, म्हणून हे आंदोलन करण्यात आले

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथे राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाअंतर्गत शेतक-यांनी खंडेरायाला जागरण गोंधळ घातला. निद्रीस्त शासनाला जाग यावी, म्हणून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलनाच्या आठव्या दिवशी आंदोलकांनी येथील विठ्ठल मंदिरात साखळी उपोषण कायम ठेवले.संतप्त ग्रामस्थ सकाळी गावात एकत्रीत आले. यावेळी शासनाच्या निषेर्धात घोषणा देण्यात येत होत्या. गावातून संबळ आणि इतर वाद्य वाजवत आंदोलकांनी फेरी काढली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावात विठ्ठल मंदिराजवळ आंदोलकांनी जागरण गोंधळ घालून परडी भरली. शासनाला सुबुद्धी येऊ दे!, शेतकºयाची इडापीडा टळू दे! अशा घोषणा देण्यात आल्या.कानगाव येथे आंदोलकांच्या भेटीसाठी दुरवरून शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते येत आहेत. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. दौंड तालुक्यातील गिरीम, शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या दोन्ही गावातील ग्रामस्थ शासनाच्या विरोधात आक्रमक झाले होते.कानगावात शासन येऊ द्याकानगावच्या ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन हे फक्त कानगावच्या शेतकºयांसाठी नाहीतर हे आंदोलन सर्व शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी आहे. तेव्हा राज्यभरातील शेतकºयांनी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ऊठाव केला पाहिजे. शेकºयांच्या मागण्या रास्त आहेत, त्यासाठी शासन कानगावात आल पाहिजे. परंतु, ज्यांच्या हातात काही नाही, असे अधिकारी आंदोलनस्थळी पाठवले जातात. अधिकारी येतात तर पदाधिकारी नसतात आणि पदाधिकारी आले तर अधिकारी नसतात. यात आश्वासनाची टोलवाटोलवी केली जाते, आंदोलक भरडला जातो. तेव्हा निर्णय क्षमता असणारे अधिकारी आणि पदाधिकारी आंदोलनस्थळी आले तर शेतकºयांची कुचेष्टा होणार नाही - हर्षवर्धन पाटील, (माजी मंत्री)