शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कानगावला शेतक-यांचा जागरण गोंधळ, राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा आठवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:01 IST

राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाअंतर्गत शेतक-यांनी खंडेरायाला जागरण गोंधळ घातला. निद्रीस्त शासनाला जाग यावी, म्हणून हे आंदोलन करण्यात आले

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथे राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाअंतर्गत शेतक-यांनी खंडेरायाला जागरण गोंधळ घातला. निद्रीस्त शासनाला जाग यावी, म्हणून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलनाच्या आठव्या दिवशी आंदोलकांनी येथील विठ्ठल मंदिरात साखळी उपोषण कायम ठेवले.संतप्त ग्रामस्थ सकाळी गावात एकत्रीत आले. यावेळी शासनाच्या निषेर्धात घोषणा देण्यात येत होत्या. गावातून संबळ आणि इतर वाद्य वाजवत आंदोलकांनी फेरी काढली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावात विठ्ठल मंदिराजवळ आंदोलकांनी जागरण गोंधळ घालून परडी भरली. शासनाला सुबुद्धी येऊ दे!, शेतकºयाची इडापीडा टळू दे! अशा घोषणा देण्यात आल्या.कानगाव येथे आंदोलकांच्या भेटीसाठी दुरवरून शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते येत आहेत. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. दौंड तालुक्यातील गिरीम, शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या दोन्ही गावातील ग्रामस्थ शासनाच्या विरोधात आक्रमक झाले होते.कानगावात शासन येऊ द्याकानगावच्या ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन हे फक्त कानगावच्या शेतकºयांसाठी नाहीतर हे आंदोलन सर्व शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी आहे. तेव्हा राज्यभरातील शेतकºयांनी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ऊठाव केला पाहिजे. शेकºयांच्या मागण्या रास्त आहेत, त्यासाठी शासन कानगावात आल पाहिजे. परंतु, ज्यांच्या हातात काही नाही, असे अधिकारी आंदोलनस्थळी पाठवले जातात. अधिकारी येतात तर पदाधिकारी नसतात आणि पदाधिकारी आले तर अधिकारी नसतात. यात आश्वासनाची टोलवाटोलवी केली जाते, आंदोलक भरडला जातो. तेव्हा निर्णय क्षमता असणारे अधिकारी आणि पदाधिकारी आंदोलनस्थळी आले तर शेतकºयांची कुचेष्टा होणार नाही - हर्षवर्धन पाटील, (माजी मंत्री)