शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘राज्यसेवा २०१९’ साठी ४१३ पदांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दहा महिने ...

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘राज्यसेवा २०१९’ साठी ४१३ पदांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दहा महिने उलटून गेले, तरी यशस्वी विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

एमपीएससीकडून विविध पदांची भरती प्रक्रिया नियमितपणे राबविली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी पाच ते सहा वर्षे अभ्यास करतात. बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचे रान करून विद्यार्थ्यांचे शिक्षण केले. या विद्यार्थ्यांनीही रात्रंदिवस मेहनत करून राज्यसेवेत १९ यश संपादन केले. मात्र, १९ जून, २०२० रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही अद्याप विद्यार्थ्यांना नियुक्ती दिलेली नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे सांगून शासनाकडून नियुक्ती देण्यास चालढकल केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ९ डिसेंबर, २०२० रोजी निकाल देताना, राज्य शासनाला नियुक्त्या करण्यापासून रोखलेले नाही, असे स्पष्टपणे सांगितले. मात्र, तरीही नियुक्त्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे ४१३ विद्यार्थ्यांपैकी एसईबीसी व्यतिरिक्त नियुक्त झालेल्या इतर समाजातील ३६५ उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ज्यांचा आरक्षणाच्या विषयाशी संबंध नाही. त्यांना नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी राज्यसेवा २०१९ मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.