शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘राज्यसेवा २०१९’ साठी ४१३ पदांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दहा महिने ...

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘राज्यसेवा २०१९’ साठी ४१३ पदांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दहा महिने उलटून गेले, तरी यशस्वी विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

एमपीएससीकडून विविध पदांची भरती प्रक्रिया नियमितपणे राबविली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी पाच ते सहा वर्षे अभ्यास करतात. बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचे रान करून विद्यार्थ्यांचे शिक्षण केले. या विद्यार्थ्यांनीही रात्रंदिवस मेहनत करून राज्यसेवेत १९ यश संपादन केले. मात्र, १९ जून, २०२० रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही अद्याप विद्यार्थ्यांना नियुक्ती दिलेली नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे सांगून शासनाकडून नियुक्ती देण्यास चालढकल केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ९ डिसेंबर, २०२० रोजी निकाल देताना, राज्य शासनाला नियुक्त्या करण्यापासून रोखलेले नाही, असे स्पष्टपणे सांगितले. मात्र, तरीही नियुक्त्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे ४१३ विद्यार्थ्यांपैकी एसईबीसी व्यतिरिक्त नियुक्त झालेल्या इतर समाजातील ३६५ उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ज्यांचा आरक्षणाच्या विषयाशी संबंध नाही. त्यांना नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी राज्यसेवा २०१९ मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.