शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

पानशेत पूरग्रस्तांच्या वारसांची नोंद करण्यास टाळटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

पुणे : ‘न्याय देण्यासाठी वेळ लागत असेल तर शेवटी देण्यात येणारा न्याय हा अन्याय असतो. याप्रमाणे पानशेत पूरग्रस्त मातंग ...

पुणे : ‘न्याय देण्यासाठी वेळ लागत असेल तर शेवटी देण्यात येणारा न्याय हा अन्याय असतो. याप्रमाणे पानशेत पूरग्रस्त मातंग समाजातील वारसांची अवस्था झाली आहे. अनेक वर्षापासून पूरग्रस्तांच्या वारसांची नाेंदीचे अर्ज प्रलंबित आहेत. या प्रलंबित अजार्वर कार्यवाही करण्यासाठी शासनदरबारी वारंवार चकरा मारून, निवेदने देऊनही ढिम्म प्रशासन हालचाल करत नाही. यांसह इतर सात मागण्यांसाठी कंटाळून मातंग समाजाच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. या वेळी अंबादास सूर्यवंशी, विशाल सकट, जयराम तलवारे, अमोल आवळे, सुनील खुडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कायार्लयासमोर शुक्रवारी भरपावसात मातंग समाज्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यांनतर जिल्हाधिकारी कायार्लयात निवेदन देण्यात आले. यामध्ये पानशेत पूरग्रस्तांच्या वारसांच्या मूळ सभासदांची नोंद करणे, घुसखोर आणि भाडेकरू यांच्याकडील अनधिकृत ताबे घेऊन मूळ पूरग्रस्तांना द्यावे, उपनिबंधक कायार्लय यांच्याकडील अभिलेख मूळ सभासदांना उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच त्यांच्याकडे किती संस्था, कायार्न्वित आहेत, किती संस्थेवर प्रशासक नेमले आहेत याची चौकशी करण्यात यावी. परवानगीशिवाय ज्या भाडेकरू व घुसखोर यांनी मालमत्ता पत्रकात नाव नोंद केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणे. भाडेकरू व घुसखोर यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले घर हे अनुसुचित जातीमधील मातंग समाजातील पूरग्रस्तांना देण्यात यावा. अनेक घुसखोर व भाडेकरू यांच्या एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावे अनेक मागासवगीय सोसायट्यामध्ये घरे आहेत. त्यांची चौकशी करणे तसेच बापुजीनगर सहकारी पुनर्वसन गृहरचना या संस्थेचे मूळ सभासद किंवा त्यांचे वारस नसतानाही व निवडणूक न घेता आपल्याकडे अध्यक्ष व सचिव म्हणून प्रस्ताव दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.