शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

पानशेत पूरग्रस्तांच्या वारसांची नोंद करण्यास टाळटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

पुणे : ‘न्याय देण्यासाठी वेळ लागत असेल तर शेवटी देण्यात येणारा न्याय हा अन्याय असतो. याप्रमाणे पानशेत पूरग्रस्त मातंग ...

पुणे : ‘न्याय देण्यासाठी वेळ लागत असेल तर शेवटी देण्यात येणारा न्याय हा अन्याय असतो. याप्रमाणे पानशेत पूरग्रस्त मातंग समाजातील वारसांची अवस्था झाली आहे. अनेक वर्षापासून पूरग्रस्तांच्या वारसांची नाेंदीचे अर्ज प्रलंबित आहेत. या प्रलंबित अजार्वर कार्यवाही करण्यासाठी शासनदरबारी वारंवार चकरा मारून, निवेदने देऊनही ढिम्म प्रशासन हालचाल करत नाही. यांसह इतर सात मागण्यांसाठी कंटाळून मातंग समाजाच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. या वेळी अंबादास सूर्यवंशी, विशाल सकट, जयराम तलवारे, अमोल आवळे, सुनील खुडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कायार्लयासमोर शुक्रवारी भरपावसात मातंग समाज्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यांनतर जिल्हाधिकारी कायार्लयात निवेदन देण्यात आले. यामध्ये पानशेत पूरग्रस्तांच्या वारसांच्या मूळ सभासदांची नोंद करणे, घुसखोर आणि भाडेकरू यांच्याकडील अनधिकृत ताबे घेऊन मूळ पूरग्रस्तांना द्यावे, उपनिबंधक कायार्लय यांच्याकडील अभिलेख मूळ सभासदांना उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच त्यांच्याकडे किती संस्था, कायार्न्वित आहेत, किती संस्थेवर प्रशासक नेमले आहेत याची चौकशी करण्यात यावी. परवानगीशिवाय ज्या भाडेकरू व घुसखोर यांनी मालमत्ता पत्रकात नाव नोंद केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणे. भाडेकरू व घुसखोर यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले घर हे अनुसुचित जातीमधील मातंग समाजातील पूरग्रस्तांना देण्यात यावा. अनेक घुसखोर व भाडेकरू यांच्या एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावे अनेक मागासवगीय सोसायट्यामध्ये घरे आहेत. त्यांची चौकशी करणे तसेच बापुजीनगर सहकारी पुनर्वसन गृहरचना या संस्थेचे मूळ सभासद किंवा त्यांचे वारस नसतानाही व निवडणूक न घेता आपल्याकडे अध्यक्ष व सचिव म्हणून प्रस्ताव दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.