पिंपरी : दहशतवाद पूर्वीपासून होता, आजही आहे. असुरांचा नाश करण्यासाठी पूर्वी देवांनी अवतार घेतला. दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला. चांगुलपणाने वाईटावर विजय मिळविला. माणसाने नेहमी आनंदी राहायला हवे, असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांनी व्यक्त केले. बालेवाडी, येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात झालेल्या सत्संगात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, माजी वनमंत्री पतंगराव कदम, आमदार लक्ष्मण जगताप, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक , काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अभय छाजेड, भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, उद्योजक सुरेंद्र गाडवे उपस्थित होते. श्री. श्री. रविशंकर यांनी शनिशिंगणापूर येथे सुरू झालेला वाद, दहशतवाद, माणसाने कसे जगावे, या विषयी मार्गदर्शन केले. सदैव आनंदी राहावे, असा गुरुमंत्रही दिला. साधकांच्या प्रश्नांना महाराजांनी उत्तरे दिली. वाढत्या दहशतवादाने अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर उपाय काय, या प्रश्नावर रविशंकर म्हणाले, ‘‘दहशतवाद वाईटच आहे. तो आजचा नाही. तो देशाबाहेरील असो किंवा देशांतर्गत असो; पुराणकथांमध्येही त्यांचे संदर्भ आढळतात. कंस, रावण या वृत्तीही वाईटच होत्या. मानवकल्याणासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’’ (प्रतिनिधी)
दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठीच अवतार
By admin | Updated: February 8, 2016 01:57 IST